शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील व्यापाऱ्यांचे एलबीटी आंदोलन भरकटलेले!

By admin | Updated: March 26, 2015 00:05 IST

अतुल शहा यांचे मत

महाराष्ट्रात सध्या एलबीटीचा प्रश्न चर्चेत आहे. प्रामुख्याने सांगलीतील काही व्यापाऱ्यांनी एलबीटीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. परंतु तो व्यवहार्य नसल्याचीच चर्चा खुद्द व्यापाऱ्यांमध्येच आहे. काही वर्षापूर्वी सांगली मनपातून एलबीटी हटावचा नारा देऊन ज्यांनी आंदोलनास प्रारंभ केला, त्यापैकी सर्वांनीच सध्या सुरु असलेल्या आंदोलनाकडे पाठ फिरविली आहे. सांगलीतील व्यापाऱ्यांची सुरु असलेली बहिष्काराची भाषा, व्हॅटवर लावण्यात येणारा जादा अधिभार, जीएसटी कर प्रणाली याविषयी महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...एलबीटी कायदा हा खरंच व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे का? - एका दृष्टीने विचार केला तर, जकातीपेक्षा एलबीटी कायदा कमी जाचक आहे. जकात रद्द करुन एलबीटी लागू करावा, अशी मागणी २००६ पासून जकात निर्मूलन समितीच्या माध्यमातून करण्यात आली होती. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या संघटित लढ्यामुळे त्याला यश आले. परंतु तत्कालीन शासनाने एलबीटी अंमलात आणताना त्यामध्ये नकळतपणे जाचक तरतुदी लागू केल्या. यामुळे व्यापाऱ्यांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. मात्र जानेवारी २०१३ मध्ये जाचक तरतुदी शासनाने नेमलेल्या अभ्यासगटाने वगळल्या. असे असले तरीही एलबीटी व्यापाऱ्यांच्या हिताचा नाही. कारण यामध्ये एलबीटी आणि व्हॅट अशी दुहेरी कर प्रणाली असून, इन्स्पेक्टरराजचा त्रास देखील व्यापाऱ्यांना होत आहे. सांगलीतील काही व्यापाऱ्यांनी एलबीटीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला आहे. तो योग्य आहे?- नाही! महाराष्ट्राचा विचार केला तर, कोणत्याही महापालिका असलेल्या क्षेत्रात व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणार नाही, अशी भूमिका घेतलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे एलबीटी विरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारी संघटना फॅमनेदेखील बहिष्काराचे आंदोलन करा, असा आदेश दिलेला नाही. मग अशावेळी येथील काही व्यापाऱ्यांनी बहिष्काराची भाषा करण्यामागील गौडबंगाल काय आहे? हे काही समजत नाही. सांगलीत जकात रद्द करुन एलबीटी लागू करा म्हणून बाबूराव जोग, राकेश मिरजे, मनोहर सारडा, विजय नानवाणी, आशिष शहा, राजेश शहा आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. त्यापैकी कोणीच बहिष्काराच्या आंदोलनात सहभागी नाहीत. प्रमुख व्यापारी संघटनांनीही आंदोलनाकडे पाठ फिरवीली आहे. ‘एलबीटी हटाव’ ही मागणी योग्य असली तरी, सांगलीतील व्यापाऱ्यांचा त्यासाठीचा मार्ग चुकलेला आहे. स्पष्टच बोलायचे तर सध्या हे आंदोलन मुख्य मुद्द्यापासून भरकटत चालले आहे. मनपा प्रशासनाने दंड व व्याज माफ केल्याशिवाय थकित एलबीटी भरणार नसल्याचा पवित्रा योग्य आहे?- व्यापाऱ्यांनी प्रथम ग्राहकांकडून वसूल केलेली सुमारे १७० कोटी रुपये असलेली एलबीटी कराची रक्कम भरुन मनपाला सहकार्य केले पाहिजे. त्यानंतर दंड व व्याज माफीची भाषा केली पाहिजे. कोणतेच प्रशासन व्यापाऱ्यांची सध्याची मागणी मान्य करणार नाही. मुळात दंड व व्याज माफ करण्याचा अधिकार मनपाला नाही, तर सरकारला आहे. राज्य सरकार दंड व व्याज माफ करण्याच्या भूमिकेचे असल्याचे दिसते आहे. परंतु यासाठी प्रथम मुद्दलाची रक्कम तर व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे जमा केली पाहिजे. शिवाय मागील दोन वर्षे १७० कोटी रुपयांचे व्याज संबंधित व्यापाऱ्यांनाच मिळाले आहे, हे देखील विसरुन चालणार नाही. व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून एलबीटी विरोधात बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे...- अहो, हे आंदोलनच चुकीच्या पायावर आधारलेले आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटी वसुलीचे पैसे प्रशासनाकडे भरावेत, ही महापालिकेने घेतलेली भूमिका योग्य आहे आणि याला सूज्ञ व्यापाऱ्यांचा पाठिंबाच आहे. एलबीटी न भरल्याने व्यापाऱ्यांना जबर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तशी झळ अद्याप येथील व्यापाऱ्यांना बसलेली नाही. कोल्हापूर, नगर, नाशिक आदी ठिकाणच्या आयुक्तांनी केलेली कारवाई पाहिली म्हणजे आपल्याला याची कल्पना येते. कायद्याने आयुक्तांना तसे अधिकार दिले आहेत. साहजिकच आंदोलनात भरकटत न जाता विचार करुन निर्णय घेणे व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे. एलबीटी रद्द झाला तर, स्थानिक स्वराज संस्थांचे भवितव्य धोक्यात येईल ?- हा चुकीचा समज आहे. देशातील तीनशे महापालिका एलबीटीविना व्यवस्थित सुरू आहेत. मुळात सरकारने घोषणा केली असली तरी, १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द होऊन जीएसटी लागू होईल, असे वाटत नाही. आज एलबीटी आणि व्हॅट असे दोन कर व्यापाऱ्यांना भरावे लागत आहेत. यामुळे येथील व्यापार शेजारील राज्यात स्थलांतरित होत आहे. वास्तविक सत्तेवर येताच एलबीटी रद्द करू, असे म्हणणाऱ्या भाजपने व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला आहे.व्हॅटवर जादा दोन टक्के अधिभार लावण्याचा सरकारचा विचार आहे. तो योग्य आहे?- जादा अधिभार लावायची खरंच गरज आहे का? याचा विचार केला पाहिजे. आज महाराष्ट्रात व्हॅटचे उत्पन्न ८० हजार कोटी रुपये आहे. त्यामधूनच १५ हजार कोटी रुपये शासनाने मनपास अनुदान दिल्यास ग्रामीण भागावर बोजा पडणार नाही. अन्यथा जादा अधिभार लावल्यास पुन्हा एकदा संघर्ष अटळ आहे.                                                                                                                                                     - नरेंद्र रानडे