शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

डेरा सच्चा समर्थकांच्या हिंसाचारावर संघाची चुप्पी, निषेधाचा एक शब्दही नाही : हे केरळ, पश्चिम बंगाल असते तर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:23 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर हरयाणासह चार राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला

ठळक मुद्देडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर हरयाणासह चार राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला.देशपातळीतून जनसामान्यांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. पश्चिम बंगाल आणि केरळामधील हिंसाचारावर तातडीने निषेध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन साधले आहे

नागपूर, दि. 26 : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर हरयाणासह चार राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला. देशपातळीतून जनसामान्यांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. मात्र एरवी पश्चिम बंगाल आणि केरळामधील हिंसाचारावर तातडीने निषेध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन साधले आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे माजी प्रचारक असल्यामुळेच या मुद्यावर संघातर्फे अद्यापपर्यंत काहीही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुरमीत राम रहीम याला न्यायालयाने दोषी ठरविताच पंचकुला, सिरसा येथे हिंसेचा आगडोंबच उसळला. यात जीवितहानी तसेच कोट्यवधींची वित्तहानीदेखील झाली. हिंसा होऊ शकते याची कल्पना अगोदर असतानादेखील पुरेशी काळजी न घेतल्याबद्दल हरयाणा सरकार व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर चोहीकडून टीका सुरू झाली. साधारणत: संघातर्फे राजकीय मुद्यांवर लगेच भाष्य करण्यात येत नाही. मात्र हा मुद्दा धार्मिक व सामाजिक असा दोहोंशीही जुळलेला आहे. शिवाय न्यायालयाने दोषी ठरविलेल्या राम रहीम याच्या समर्थकांनी खुलेआम नियमांना पायदळी तुडवले आहे. अशा स्थितीत सामाजिक संघटन म्हणून संघातर्फे या प्रकाराचा निषेध अपेक्षित होता. मात्र संघाने ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेत मौन राखणे पसंत केले आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांच्याशीदेखील प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. 

हा दुजाभाव का ?पश्चिम बंगालमध्ये तृणमूल समर्थक तसेच समाजकंटकांकडून हिंसाचार झाल्यानंतर संघाने कडक शब्दांत त्याचा निषेध केला होता. केरळमध्ये तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संघात प्रचंड तणाव आहे. संघ स्वयंसेवकांवर डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ले झाल्यानंतर संघाकडून टीकेची झोड उठविण्यात येते. असे असताना हरयाणातील हिंसाचारावर संघाने साधलेले मौन आश्चर्यजनक आहे.