शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘सनातन’च्या आठवले यांची चौकशी

By admin | Updated: March 2, 2017 01:03 IST

गोव्यातील आश्रमात धडक; ‘एसआयटी’चे पथक दोन दिवस तळ ठोकून

विश्वास पाटील --- कोल्हापूर ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी गोव्यातील सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी व बुधवारी कसून चौकशी केली. ही चौकशी सुमारे साडेतीन तासांहून जास्त काळ सुरू होती; परंतु चौकशीतील तपशिलांबाबत फारशी माहिती पोलिस यंत्रणेकडून उपलब्ध होऊ शकली नाही.पानसरे खूनप्रकरणाचे तपास अधिकारी सुहेल शर्मा, सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुणे व फौजदार रमेश ढाणे यांच्या पथकाने ही चौकशी केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. हे तिघेही अधिकारी साध्या वेशात गेले होते. तिथे त्यांनी गोवा मडगाव येथील स्थानिक पोलिसांचीही चौकशीसाठी मदत घेतली; परंतु त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी जे तीन प्रमुख संशयित आहेत त्या सारंग अकोळकर, विनय पवार आणि डॉ. वीरेंद्र तावडे हे सनातन संस्थेचे साधक आहेत. पानसरे खून प्रकरणातील संशयित समीर गायकवाड हा देखील ‘सनातन’चा पूर्ण वेळ साधक होता. या चौघांचेही गोवा आश्रमात वास्तव्य होते. त्यातील समीर गायकवाड सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याचे वास्तव्य कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहे. तावडे हा देखील न्यायालयीन कोठडीत असून, तो येरवडा कारागृहात आहे. सारंग अकोळकर व विनय पवार हे दोघेही गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटापासून फरार आहेत. त्या स्फोटातही त्यांचा सहभाग होता, असा अकोळकर व विनय पवार यांच्यावर संशय आहे. पानसरे खूनप्रकरणात या दोघांनीच पानसरे यांच्यावर गोळ््या झाडल्याचा पोलिसांचा आरोप आहे व तसा उल्लेख पुरवणी दोषारोपपत्रातही आहे; परंतु ते गेल्या सुमारे आठ वर्षांपासून फरार असल्याने त्यांच्याबाबतची विचारपूस करण्यासाठी ‘एसआयटी’च्या पथकाने डॉ. आठवले यांची चौकशी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पथकाने ‘सनातन’च्या आश्रमाची व तिथे काय स्वरूपाचे व्यवहार चालतात, किती साधक आहेत, त्यांना कोणते प्रशिक्षण दिले जाते यासंबंधीची माहिती जाणून घेतली. बुधवारीच सीबीआयने अकोळकर व विनय पवार यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पानसरे खूनप्रकरणातही महाराष्ट्र सरकारने माहिती देणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ ला ते त्यांच्या सागरमाळ परिसरातील निवासस्थानी मॉर्निंग वॉकहून परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा बुरखाधाऱ्यांनी गोळ््या झाडल्या. त्यात ते आणि त्यांच्या पत्नी उमा गंभीर जखमी झाल्या होत्या. २० फेब्रुवारी २०१५ ला उपचार सुरू असताना पानसरे यांचा मृत्यू झाला तर पत्नी उमा यांच्या डोक्याला गोळी चाटून गेली होती त्या सुदैवाने बचावल्या. कसोशीने प्रयत्न व चौकशी करूनही अकोळकर व पवार यांच्याबद्दल पोलिसांना आतापर्यंत कोणताच सुगावा लागलेला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी सनातन संस्थेची थेट गोव्यात जावून चौकशी सुरू केली असल्याचे या सूत्रांनी सांगितले.सुहेल शर्मा यांची बदली होण्याची शक्यता..पानसरे खून खटल्याचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांची पदोन्नतीने बदली होण्याची शक्यता आहे. पानसरे खून प्रकरणाचा तपास अगदी सुरुवातीला तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अंकित गोयल, त्यानंतर एस. चैतन्या, दिनेश बारी व त्यानंतर सध्या सुहेल शर्मा करत आहेत. ते गेले आठ महिने या प्रकरणाचा तपास करीत आहेत; परंतु त्यांची पदोन्नतीवर बदली होणार असून, त्याचा तपासकामावर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयानेही वारंवार तपास अधिकारी बदलण्याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे.गोव्यातील ‘सनातन’ संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची आश्रमात जाऊन मंगळवारी आणि बुधवारी विशेष पोलिस पथकाने चौकशी केली; परंतु चौकशीचा तपशील सांगता येणार नाही.- सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक