शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

समृद्धी महामार्गामुळे चेहरामोहरा बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:24 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असून हा महामार्ग राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असून हा महामार्ग राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.राज्य शासनाच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कर्न्व्हजन्स २०१८’ या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर झाले. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, रामदास आठवले, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह देशविदेशातील प्रख्यात उद्योगपती मंचावर उपस्थित होते.एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य असेल, असे सांगून मोदी म्हणाले, देशातील सर्व राज्यांमध्ये विकासाची स्पर्धा आज होत आहे. गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न सगळेच करीत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचे पर्व आणखी पुढे गेले आहे. ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’द्वारे त्यांनी सुधारणांचे आणि मानवी हस्तक्षेप कमी करणारे निर्णय घेतल्याने आणि कालमर्यादेत निर्णय घेणारे वर्क कल्चर आणल्याने आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्यावर्षी देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात (५१ टक्के)आली.मेक इन इंडियात दोन वर्षापूर्वी झालेल्या करारांपैकी निम्मेपेक्षा अधिक प्रगतीपथावर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.टाटा म्हणतात,महाराष्ट्र अतुल्यटाटा समूहातील पहिल्या कंपनीची सुरूवात १८७७ मध्ये नागपुरात झाली. इतक्या वर्षांचा अनुभव, येथील वास्तव्य व आजच्या नेतृत्त्वाबद्दलचा अनुभव यावरुन मी सांगतो की महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अतूल्य आहे. टाटांकडून या राज्याला कायम सहकार्य मिळत राहील, अशीग्वाही प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी दिली.राज्यात गुंतवणूकअनुकुल वातावरण तयार केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासह नामवंत उद्योगपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली. इझ आॅफ डुर्इंग बिझनेसह कालमर्यादेत ते घेत असलेल्या निर्णयांचे टाटा-अंबानींसह सर्वांनीच कौतूक केले.शिवसेनेचा सहभाग केवळ देसार्इंपुरताचआजच्या उद्घाटन समारंभात शिवसेनेचा सहभाग हा केवळ उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यापुरताच मर्यादित राहिला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परिषदेला पाठ दाखविली. शिवसेनेचे अन्य मंत्री वा नेते फिरकले नाहीत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग