शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

समृद्धी महामार्ग कृषी खात्याचा विषय नाही

By admin | Updated: June 15, 2017 01:30 IST

समृद्धी महामार्ग कृषी खात्याशी संबंधित विषय नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो विषय हाताळत असल्याने त्याबद्दल आपल्याला काही बोलायचे नाही, अशा शब्दांत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : समृद्धी महामार्ग कृषी खात्याशी संबंधित विषय नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो विषय हाताळत असल्याने त्याबद्दल आपल्याला काही बोलायचे नाही, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या विषयासंबंधीच्या प्रश्नाला बुधवारी बगल दिली.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी कोकण विभागाची आढावा बैठक फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषी खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार हेही या वेळी हजर होते. या वेळी कोकण विभागातील खरीप हंगामाचा आणि ‘उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी’ या सरकारने सुरू केलेल्या अभियानाचा आढावा घेतला. कर्जमाफीकरिता शेतकरी रस्त्यावर उतरतो. मात्र, परिस्थिती आमूलाग्र बदलली तर एक दिवस असा येईल की, कर्जासाठी शेतकऱ्याला बँकेच्या दारात जावे लागणार नाही, असे फुंडकर म्हणाले. राज्याच्या अन्य भागाप्रमाणेच कोकणातही शेतीकरिता मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्याने आता यांत्रिकीकरण झाले पाहिजे, असेही फुंडकर म्हणाले. शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा निर्णय सरकारने घेतला असून शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढून दिली आहे. सध्या राज्यातून १ लाख अर्ज आले असल्याचे त्यांनी सांगितले. कृषिप्रधान देशात ७० वर्षे लोटल्यानंतरही शेती तोट्यात असून उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात व कृषी खात्याला सर्व जण लक्ष्य करतात, याबद्दल फुंडकर यांनी नाराजी प्रकट केली. हवामानाचा अंदाज सांगणारे स्वयंचलित यंत्र बसवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पाच गावांत एक केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना तासाभरात हवामानाची माहिती मिळेल. तसेच ग्रामपंचायती डिजिटल झाल्यास शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेता येईल, असे फुंडकर म्हणाले.शेतीच्या यांत्रिकीकरणाबाबत चर्चाकोकण विभागात मजुरीचा दर आणि पर्यायाने उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर, या विभागात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण वाढले पाहिजे. याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांबाबत या वेळी आढावा घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.