शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

सत्तातर मोदीलाट कायम

By admin | Updated: October 20, 2014 06:29 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र लढूनदेखील बहुमताच्या जवळपास जाणारे यश भाजपाला मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र लढूनदेखील बहुमताच्या जवळपास जाणारे यश भाजपाला मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांनी केलेल्या एकहाती प्रचाराचे हे यश आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला ४२ जागांवर यश मिळाले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत किमान २४० जागांवर आघाडी मिळेल, असा विश्वास राज्यातील भाजपा नेत्यांना होता. त्याकरिता शिवसेनेबरोबर असलेली २५ वर्षांची युती भाजपाने तोडली. यापूर्वी भाजपा ११९, तर शिवसेना १६९ जागा लढत होती. युतीच्या जागावाटपात भाजपाला १३५ पेक्षाही कमी जागा मिळत असल्याचे दिसताच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय योग्यच होता, हे निकालाने दाखवून दिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांवरून खूप टीका झाली. पण निवडून आलेल्या १२२ जणांमध्ये ३०हून अधिक आयारामांचा समावेश आहे. त्यामुळे तो निर्णयही भाजपाच्या पथ्यावरच पडला. खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जनाधार असलेल्या नेत्याची पोकळी भाजपामध्ये निर्माण झाली होती. विशेषत: ओबीसी समाजातील नेतृत्व नव्हते. पण पंकजा मुंडे यांना संघर्ष यात्रेवर पाठवून ती पोकळी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विदर्भात नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवर, खान्देशात एकनाथ खडसे, प. महाराष्ट्रात राजू शेट्टी, महादेव जानकर आदी मित्रपक्षांचे नेते, मराठवाड्यात पंकजा, मुंबईत विनोद तावडे अशी तगडी टीम प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली. मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा पुढे न करता सामूहिक नेतृत्व उभे केल्याने राज्यात भाजपाच्या जागा वाढल्या. २००९ ला मिळालेल्या ४६ जागांवरून १२२ जागांवर भाजपाला मजल मारता आली. त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली.प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पराभूत करण्याकरिता भाजपाने वेचून वेचून बिभीषण गोळा केले होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उभी केलेली प्रचार यंत्रणा आणि मोदींच्या २७ सभांचा झंझावात असे समीकरण जुळून आल्याने भाजपाला यश प्राप्त झाले. भाजपाने जिंकलेल्या जागा पाहता, गेल्या वेळपेक्षा किमान ७५हून अधिक जागांची वाढ झाली आहे. बहुमताचा जादूई आकडा गाठता आला नाही, तरी सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ असल्याने राज्यपाल भाजपालाच पाचारण करणार, हे उघड आहे. पाठिंबा कोणाचा, राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा, एवढाच काय तो प्रश्न आहे!