शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सत्तातर मोदीलाट कायम

By admin | Updated: October 20, 2014 06:29 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र लढूनदेखील बहुमताच्या जवळपास जाणारे यश भाजपाला मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र लढूनदेखील बहुमताच्या जवळपास जाणारे यश भाजपाला मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांनी केलेल्या एकहाती प्रचाराचे हे यश आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला ४२ जागांवर यश मिळाले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत किमान २४० जागांवर आघाडी मिळेल, असा विश्वास राज्यातील भाजपा नेत्यांना होता. त्याकरिता शिवसेनेबरोबर असलेली २५ वर्षांची युती भाजपाने तोडली. यापूर्वी भाजपा ११९, तर शिवसेना १६९ जागा लढत होती. युतीच्या जागावाटपात भाजपाला १३५ पेक्षाही कमी जागा मिळत असल्याचे दिसताच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय योग्यच होता, हे निकालाने दाखवून दिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांवरून खूप टीका झाली. पण निवडून आलेल्या १२२ जणांमध्ये ३०हून अधिक आयारामांचा समावेश आहे. त्यामुळे तो निर्णयही भाजपाच्या पथ्यावरच पडला. खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जनाधार असलेल्या नेत्याची पोकळी भाजपामध्ये निर्माण झाली होती. विशेषत: ओबीसी समाजातील नेतृत्व नव्हते. पण पंकजा मुंडे यांना संघर्ष यात्रेवर पाठवून ती पोकळी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विदर्भात नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवर, खान्देशात एकनाथ खडसे, प. महाराष्ट्रात राजू शेट्टी, महादेव जानकर आदी मित्रपक्षांचे नेते, मराठवाड्यात पंकजा, मुंबईत विनोद तावडे अशी तगडी टीम प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली. मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा पुढे न करता सामूहिक नेतृत्व उभे केल्याने राज्यात भाजपाच्या जागा वाढल्या. २००९ ला मिळालेल्या ४६ जागांवरून १२२ जागांवर भाजपाला मजल मारता आली. त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली.प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पराभूत करण्याकरिता भाजपाने वेचून वेचून बिभीषण गोळा केले होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उभी केलेली प्रचार यंत्रणा आणि मोदींच्या २७ सभांचा झंझावात असे समीकरण जुळून आल्याने भाजपाला यश प्राप्त झाले. भाजपाने जिंकलेल्या जागा पाहता, गेल्या वेळपेक्षा किमान ७५हून अधिक जागांची वाढ झाली आहे. बहुमताचा जादूई आकडा गाठता आला नाही, तरी सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ असल्याने राज्यपाल भाजपालाच पाचारण करणार, हे उघड आहे. पाठिंबा कोणाचा, राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा, एवढाच काय तो प्रश्न आहे!