शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: November 8, 2015 00:25 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १५ दिवसांची

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १५ दिवसांची वाढ करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुनीलजित पाटील यांनी हे आदेश शनिवारी दिले. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे न्यायालय व कारागृह प्रशासनाचा संवाद होऊ न शकल्याने न्यायालयातच समीरच्या गैरहजेरीत सुनावणी झाली. समीर सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी समीरच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्याची दाट शक्यता होती. पुरेसा पोलीस फौजफाटा उपलब्ध नसल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचा निर्णय झाला. साडेचारच्या सुमारास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुनीलजित पाटील यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे दोन्ही बाजूंचा संवाद होऊ शकला नाही. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी संशयित आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती यावेळी केली. त्यावर न्या. पाटील यांनी समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करीत असल्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी) समीरला काही सांगायचे आहे समीर गायकवाड याची कळंबा कारागृहात त्याचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी शनिवारी सकाळी भेट घेतली. यावेळी समीरने तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याला न्यायालयाला पत्र द्यायचे आहे किंवा न्यायालयात स्वत: हजर राहून सांगायचे आहे. त्यामुळे त्याला आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करावे, असा अर्ज अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांना दिला. त्यावर न्या. डांगे यांनी १७ नोव्हेंबर ही सुनावणीची तारीख देत, सरकारी वकिलांनी म्हणणे सादर करावे. त्यानंतर या अर्जावर निकाल दिला जाईल, असे सांगितले.