शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

समीर गायकवाडची जामिनावर सुटका नाही

By admin | Updated: July 12, 2016 03:49 IST

समीर गायकवाड याचा कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असणारे अनेक परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार असल्याने त्याची जामिनावर सुटका करणे योग्य नाही,

मुंबई : समीर गायकवाड याचा कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असणारे अनेक परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार असल्याने त्याची जामिनावर सुटका करणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला.कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला समीर गायकवाड याने आपल्याविरुद्ध काहीही ठोस पुरावे नसूनही आपल्याला कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे, असे जामीन अर्जात म्हटले आहे. या अर्जावरील सुनावणी न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे होती. यापूर्वी दोनदा कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.‘गायकवाडविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे आहेत. तसेच १४ वर्षीय अथर्व शिंदे याची साक्ष नाकारण्याचा प्रश्न येत नाही. गायकवाडला अटक करण्यापूर्वीच त्याने पोलिसांपुढे जबाब नोंदवला होता. त्याची साक्ष ग्राह्य धरायची की नाही, हे खटल्याच्या वेळी न्यायाधीश ठरवतील. गायकवाडचा या हत्येमागे हात आहे, हे दर्शविणारे अनेक पुरावे तपासयंत्रणेकडे उपलब्ध आहेत,’ असे निरीक्षण न्या. बदर यांनी नोंदवले. राज्य सरकार या खटल्यावर स्थगिती मागून जाणुनबुजून विलंब करत आहे. त्यामुळे संविधानाने अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या अधिकारांचा भंग होत आहे, असा युक्तिवाद गायकवाडचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला. त्यांचा युक्तिवाद फेटाळताना न्या. बदर यांनी म्हटले की, या खटल्यातील मुद्देमाल सीबीआयने स्कॉटलंड यार्डला पाठवल्याने सरकारने या खटल्यावर स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. मुद्देमाल नसल्याने या खटल्यास विलंब होत आहे. त्यामुळे अर्जदाराच्या अधिकारांचा भंग होत नाही. (प्रतिनिधी)