शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर

By admin | Updated: June 18, 2017 03:44 IST

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर विष्णू गायकवाड याला शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीश

- लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर विष्णू गायकवाड याला शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सशर्त जामीन मंजूर केला. सुनावणीवेळी समीर न्यायालयात हजर होता. कागदपत्रांची पूर्तता वेळेत होऊ न शकल्यामुळे त्याची कारागृहातून सोमवारी सुटका होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी दि. १७ जुलै रोजी होणार आहे.समीर गायकवाडला विशेष तपास पथकाने (एसआयटी) १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक केली होती. उमा पानसरे व शैलेंद्र मोरे या साक्षीदारांनी ओळख परेडवेळी विनय पोवार आणि सारंग अकोळकर या मारेकऱ्यांना ओळखले होते. त्यामध्ये समीर गायकवाडचा समावेश नसल्याचे साक्षीवरून दिसून आले. या दोघांच्या साक्षीमुळे अथर्व शिंदे याची साक्ष आपोआपच खोटी ठरत असल्याच्या मुद्द्यावरून त्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही निर्बंध घातले आहेत. सुनावणी सुरू असतानाच न्यायाधीश बिले यांनी समीरला पुढे बोलावले, त्याला तुझा जामीन अर्ज मंजूर झाल्याचे सांगताना त्यासाठी अटी घातल्याचेही सांगितले. या वेळी समीरचे वकील समीर पटवर्धन, तपासी अधिकारी सोहेल शर्मा हे न्यायालयात उपस्थित नव्हते.गायकवाड याने सलग तिसऱ्यांदा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता, पण तो विविध कारणास्तव फेटाळला होता. त्याच्या जामीनाला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले. कोणत्या मुद्द्यावर जामीन मंजूरअथर्व शिंदे याने समीरने गोळ्या घातल्याचे सांगितले होते, पण उमा पानसरे व शैलेंद्र शिंदे यांनी विनय पोवार व सारंग अकोळकर यांनी गोळ्या घातल्याचे ओळखपरेडमध्ये सांगितले. या दोन्हीही साक्षींत तफावत आढळते, तसेच पोवार व अकोळकर यांना या दोघा साक्षीदारांनीही हल्ल्याच्या आदल्या दिवशी परिसरात रेकी करताना पाहिल्याचे सांगितले.या खटल्याचा तपास सुरू राहू दे, पण मला जामीन द्या, असा समीरने न्यायालयात अर्ज केला होता.उच्च न्यायालयाच्या नवीन नियमानुसार, दोन वर्षांत प्रलंबित खटला (अंडरट्रायल) संपवायचा आहे, पण गेली २१ महिने समीर अटकेत आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत हा खटला संपणे शक्य नाही. त्यामुळे समीरच्या नैसर्गिक हक्काचे हनन होत आहे, हेही न्यायाधिशांनी ग्राह्य धरले.न्यायालयाने घातलेले निर्बंध..- दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष तपास पथकाच्या कोल्हापुरातील कार्यालयात हजेरी द्यावी.- न्यायालयीन कामाव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यात त्यास प्रवेश करता येणार नाही.- पासपोर्ट असल्यास न्यायालयाकडे जमा करावा.-महाराष्ट्र सोडून कोठेही बाहेर जाऊ नये.