शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या १०० जागा लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:14 IST

मुख्यमंत्र्यांच्या शेळ्यासुद्धा आता चोरीस जाऊ लागल्या आहेत. राज्यात अनागोंदी माजलेली आहे.

पंढरपूर (जि़ सोलापूर) : राज्यातील भाजपा सरकारविषयी सर्वच समाजघटकांत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवत आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड १०० जागा लढवणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यासाठी संभाजी ब्रिगेड राज्यभर ५० दिवसांची रथयात्रा काढून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.संघटना बांधणी आणि सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खेडेकर हे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत.भीमा-कोरेगाव, औरंगाबाद येथील दंगली सरकार पुरस्कृत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शेळ्यासुद्धा आता चोरीस जाऊ लागल्या आहेत. राज्यात अनागोंदी माजलेली आहे. मात्र तरीही भाजपा सरकारवर नाराज झालेले लोक लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील असे नाही. शेतकरी, युवक, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न घेऊन ब्रिगेड पुढे जाणार आहे, असेही खेडेकर म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक