शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेड उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 06:04 IST

लोकसभेच्या ३०, तर विधानसभेच्या १०० जागा लढविणार

मुंबई : औरंगाबादमध्ये ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळाव्याची हाक देत, संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी ही माहिती दिली.

डोके म्हणाले की, सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते. मात्र, स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही. तरुणांच्या रोजगाराऐवजी शहरांची नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.

लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले, तसेच आगामी निवडणुकीचे बिगुल वाजवण्ययासाठी ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात निवडणुकीचा अजेंडा व पुढील वाटचालीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे, ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष दिनेश महाडिक यांनी स्पष्ट केले.

महाडिक म्हणाले की, बºयाच मतदार संघात आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. सोबतच समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचेही त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले.‘दंगली पेटवू नका!’निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा उकरून काढत, शिवसेनेकडून हिंदू-मुस्लीम धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ब्रिगेडने केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना धनगर आणि मुस्लीम आरक्षण प्रलंबित ठेवत सरकार जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. अशाप्रकारे देशात दंगली पेटवून भावनिक मुद्द्यांवर मते लाटण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहनही ब्रिगेडने केले आहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९