शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

संभाजी ब्रिगेड उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 06:04 IST

लोकसभेच्या ३०, तर विधानसभेच्या १०० जागा लढविणार

मुंबई : औरंगाबादमध्ये ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळाव्याची हाक देत, संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी ही माहिती दिली.

डोके म्हणाले की, सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते. मात्र, स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही. तरुणांच्या रोजगाराऐवजी शहरांची नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.

लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले, तसेच आगामी निवडणुकीचे बिगुल वाजवण्ययासाठी ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात निवडणुकीचा अजेंडा व पुढील वाटचालीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे, ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष दिनेश महाडिक यांनी स्पष्ट केले.

महाडिक म्हणाले की, बºयाच मतदार संघात आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. सोबतच समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचेही त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले.‘दंगली पेटवू नका!’निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा उकरून काढत, शिवसेनेकडून हिंदू-मुस्लीम धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ब्रिगेडने केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना धनगर आणि मुस्लीम आरक्षण प्रलंबित ठेवत सरकार जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. अशाप्रकारे देशात दंगली पेटवून भावनिक मुद्द्यांवर मते लाटण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहनही ब्रिगेडने केले आहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९