शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वीर बाजीप्रभूंची समाधी शिवपे्रमींच्या नजरेआड

By admin | Updated: July 12, 2017 00:42 IST

वीर बाजीप्रभूंची समाधी शिवपे्रमींच्या नजरेआड

आर. एस. लाड । लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : तोफांची इशारत झाली अन् घायाळ बाजीप्रभूंनी घोडखिंडीत प्राण सोडले... बांदल मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड झाली... विशाळगडावरील धारकऱ्यांनी बाजी व फुलाजी देशपांडे या दोघा बंधंूचे मृतदेह गडावर नेले. शिवरायांनी स्वत: पाताळदरी येथे त्यांच्यावर अत्यसंस्कार केले. आजही तेथे देशपांडे बंधंूची घडीव दगडी बांधकामातील समाधी ऊन, वारा, सोसत उजाड माळावर गेली ३५७ वर्षे जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत शिवभक्तांच्या वाटेकडे डोळे लावून आहे.गेल्या चार वर्षांत गड व पायथा जोडणारा पूल, गडावरील पायरी रस्ता, मुंढा दरवाजाची उभारणी झाली. गडाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे; पण ज्यांनी स्वराज्याला तारले व जे विशाळगडच्या प्रेरणेचा स्त्रोत आहे, त्या देशपांडे बंधंूच्या समाधीकडे शासन व शिवप्रेमींची डोळेझाक झाली आहे. समाधीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. भंगवंतेश्वर ते समाधी स्थळ या दरम्यानचा फरस बंदीचा रस्ता काळाच्या ओघात गायब झाला आहे. प्लास्टिक, कोंबडीची पिसे या अस्वच्छता व दुर्गंधीने समाधीकडे जाणाऱ्या वाटेची नाकेबंदी केली आहे. गडावर येणारा बहुतेक पर्यटक गैरसोयींमुळे या समाधीकडे फिरकत नाहीत. समाधीच्या वाटेवरची अस्वच्छता पाहून शिवभक्त मैलावरूनच समाधीचे मुखदर्शन घेतो. समाधी स्थळाजवळ बारमाही पाण्याची छोटी विहीर शिवकालीन पाण्याचा स्त्रोत आहे; पण आज ही विहीर दगड, बाटल्यांनी बुजविली आहे. बाजींच्या समाधीवर मेघडंबरी उभारून समाधी बंदिस्त बांधकामाने सुरक्षित ठेवण्याची गरज येथील शिवाजी तरुण मंडळाचे प्रमुख बंडू भोसले यांनी व्यक्त केली. सुलभ रस्ते, पाणी सुविधा, बगीचा, वृक्षारोपण, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गाथा, दिशादर्शक फलक, कचराकुंडी, बैठक व्यवस्था उभारून येथे सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. कोंबडे कापून पार्टीची मजा लुटणारी मानसिकता बदलताना गडाचा शिवकालीन इतिहास चिरंतन ठेवणारे हे स्मारक होण्याची गरज आहे. राजस्थानातील काही गडांवर शासकीय व सेवाभावी संस्थांमार्फत स्वच्छता राखून तेथील ऐतिहासिक पावित्र्य जपले जाते. त्या पद्धतीने या गडावरही इतिहासाचा बाज राखणारी यंत्रणा उभारावी लागेल. हजारो तरुणांचे जथ्थे जुलैमध्ये पन्हाळा ते विशाळगड या शिवकालीन मार्गावर साहसी मोहिमेसाठी येतात; पण बहुतेक मोहिमा पावनखिंडीतच अर्धविराम घेतात. पावनखिंड ते विशाळगड ही पुढील सुमारे बारा किलोमीटरची मोहीम होत नसल्याने बाजींच्या समाधीस्थळापर्यंत शिवप्रेमींना जाता येत नाही. साहजिकच गडावरील इतिहास व बाजींच्या समाधीचे दर्शन शिवभक्तांपासून दुर्लक्षितच राहते. पावनखिंडीतील बाजींच्या स्मारकापर्यंत शिवप्रेमींसह शासकीय यंत्रणाही धावते; पण गडावरील बाजींच्या समाधीकडे कोणीही फिरकताना दिसत नाही. ही खंत विशाळगडवासीयांनी व्यक्त केली.गड-किल्ले पार्टीचे अड्डे...सह्याद्रीच्या माथ्यावरील स्वराज्याचे हे जिवंत साक्षीदार आज हौशी मंडळीच्या पार्टीचे अड्डे बनले आहेत. काही मंडळी सेल्फीच्या नादात तेथील पावित्र्य विसरत आहेत. गड हे गौरवशाली पराक्रमांची वारसास्थळे बनविणारी दिशा मोहिमेच्या केंद्रस्थानी असावी. साहसी पर्यटन म्हणून या मोहिमा न होता इतिहास जपणारा प्रवाह उभा करणारी शक्ती यातून उभी करावी लागेल.