शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

वीर बाजीप्रभूंची समाधी शिवपे्रमींच्या नजरेआड

By admin | Updated: July 12, 2017 00:42 IST

वीर बाजीप्रभूंची समाधी शिवपे्रमींच्या नजरेआड

आर. एस. लाड । लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : तोफांची इशारत झाली अन् घायाळ बाजीप्रभूंनी घोडखिंडीत प्राण सोडले... बांदल मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड झाली... विशाळगडावरील धारकऱ्यांनी बाजी व फुलाजी देशपांडे या दोघा बंधंूचे मृतदेह गडावर नेले. शिवरायांनी स्वत: पाताळदरी येथे त्यांच्यावर अत्यसंस्कार केले. आजही तेथे देशपांडे बंधंूची घडीव दगडी बांधकामातील समाधी ऊन, वारा, सोसत उजाड माळावर गेली ३५७ वर्षे जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत शिवभक्तांच्या वाटेकडे डोळे लावून आहे.गेल्या चार वर्षांत गड व पायथा जोडणारा पूल, गडावरील पायरी रस्ता, मुंढा दरवाजाची उभारणी झाली. गडाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे; पण ज्यांनी स्वराज्याला तारले व जे विशाळगडच्या प्रेरणेचा स्त्रोत आहे, त्या देशपांडे बंधंूच्या समाधीकडे शासन व शिवप्रेमींची डोळेझाक झाली आहे. समाधीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. भंगवंतेश्वर ते समाधी स्थळ या दरम्यानचा फरस बंदीचा रस्ता काळाच्या ओघात गायब झाला आहे. प्लास्टिक, कोंबडीची पिसे या अस्वच्छता व दुर्गंधीने समाधीकडे जाणाऱ्या वाटेची नाकेबंदी केली आहे. गडावर येणारा बहुतेक पर्यटक गैरसोयींमुळे या समाधीकडे फिरकत नाहीत. समाधीच्या वाटेवरची अस्वच्छता पाहून शिवभक्त मैलावरूनच समाधीचे मुखदर्शन घेतो. समाधी स्थळाजवळ बारमाही पाण्याची छोटी विहीर शिवकालीन पाण्याचा स्त्रोत आहे; पण आज ही विहीर दगड, बाटल्यांनी बुजविली आहे. बाजींच्या समाधीवर मेघडंबरी उभारून समाधी बंदिस्त बांधकामाने सुरक्षित ठेवण्याची गरज येथील शिवाजी तरुण मंडळाचे प्रमुख बंडू भोसले यांनी व्यक्त केली. सुलभ रस्ते, पाणी सुविधा, बगीचा, वृक्षारोपण, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गाथा, दिशादर्शक फलक, कचराकुंडी, बैठक व्यवस्था उभारून येथे सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. कोंबडे कापून पार्टीची मजा लुटणारी मानसिकता बदलताना गडाचा शिवकालीन इतिहास चिरंतन ठेवणारे हे स्मारक होण्याची गरज आहे. राजस्थानातील काही गडांवर शासकीय व सेवाभावी संस्थांमार्फत स्वच्छता राखून तेथील ऐतिहासिक पावित्र्य जपले जाते. त्या पद्धतीने या गडावरही इतिहासाचा बाज राखणारी यंत्रणा उभारावी लागेल. हजारो तरुणांचे जथ्थे जुलैमध्ये पन्हाळा ते विशाळगड या शिवकालीन मार्गावर साहसी मोहिमेसाठी येतात; पण बहुतेक मोहिमा पावनखिंडीतच अर्धविराम घेतात. पावनखिंड ते विशाळगड ही पुढील सुमारे बारा किलोमीटरची मोहीम होत नसल्याने बाजींच्या समाधीस्थळापर्यंत शिवप्रेमींना जाता येत नाही. साहजिकच गडावरील इतिहास व बाजींच्या समाधीचे दर्शन शिवभक्तांपासून दुर्लक्षितच राहते. पावनखिंडीतील बाजींच्या स्मारकापर्यंत शिवप्रेमींसह शासकीय यंत्रणाही धावते; पण गडावरील बाजींच्या समाधीकडे कोणीही फिरकताना दिसत नाही. ही खंत विशाळगडवासीयांनी व्यक्त केली.गड-किल्ले पार्टीचे अड्डे...सह्याद्रीच्या माथ्यावरील स्वराज्याचे हे जिवंत साक्षीदार आज हौशी मंडळीच्या पार्टीचे अड्डे बनले आहेत. काही मंडळी सेल्फीच्या नादात तेथील पावित्र्य विसरत आहेत. गड हे गौरवशाली पराक्रमांची वारसास्थळे बनविणारी दिशा मोहिमेच्या केंद्रस्थानी असावी. साहसी पर्यटन म्हणून या मोहिमा न होता इतिहास जपणारा प्रवाह उभा करणारी शक्ती यातून उभी करावी लागेल.