शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साळवाडीचा नादुरुस्त पूल अखेर कोसळला

By admin | Updated: September 21, 2016 01:34 IST

बोरी बुद्रुक व साळवाडी गावांना जोडणारा पूल निकृष्ट कामामुळे मंगळवारी कोसळला.

राजुरी : बोरी बुद्रुक व साळवाडी गावांना जोडणारा पूल निकृष्ट कामामुळे मंगळवारी कोसळला. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. या भागातील जवळपास १० गावांना जोडणाऱ्या कुकडी नदीवरील या पुलाचे काम जवळपास २५ वर्षांपूर्वी झालेले होते. ठकेदाराने निकृष्ट काम केले होते. नदीला पूर आल्याने काही दिवसांतच पाया खचल्याने पूल धोकादायक झाला होता. सातत्याने खचणाऱ्या पुलाचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. मात्र, पाटबंधारे खाते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीबाबत कुठलीच हालचाल न केल्याने हा पूल कोसळला.आॅगस्ट महिन्याच्या १० तारखेला हा पूल पहाटे खचून पुलाला मोठी भेग पडली होती. तेव्हपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा खचलेल्या पुलाचे दोन तुकडे होऊन स्लॅब कोसळला. दुरवस्थेमुळे भविष्यात पुलाला धोका असल्यामुळे दुरुस्तीबाबत लोकमतने दोन वर्षांपासून वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. फेब्रुवारीच्या १५ तारखेलाही पूल कोसळण्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करून पुलाची दुरुस्ती करण्याच्या मागणीचे पत्र दोन्ही गावांतील सरपंच पुष्पा कोरडे तसेच कैलास काळे व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोर व सुनील जाधव यांनी केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने हा पूल सोसळला.>पूल कोसळल्यामुळे नागरिकांना सुमारे २५ किलोमीटर अंतर कापून यावे लागत आहे. पुलाच्या कामासाठी एक कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असूनही काम आता तरी त्वरित सुरू करण्यात यावे; अन्यथा उपोषण करण्यात इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेद्र भोर व सुनील जाधव यांनी दिला आहे.पुलाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते. त्यांनी पाहणी करून पुलाच्या दुरुस्तीबाबत आश्वासन दिले होते. दुरुस्तीसाठी येथील वाहतूकही बंद करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नव्हते. पाहणीनंतर तब्बल ४० दिवसांनी ही घटना घडली. हा पूल तेव्हापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे दोन्ही गावांच्या बाजूला असणाऱ्या दहा ते बारा गावांना याचा फटका बसला असून पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे.