शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

तंबाखुमुक्तीला शाळांचा ‘सलाम’!

By admin | Updated: February 1, 2015 02:49 IST

राज्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्त विद्यार्थी मोहिमेला यश येत आहे. सलाम फाउंडेशनच्या प्रयत्नांनी राज्यातील ३२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.

राकेश जोशी - नाशिक शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असतानाच आता आशेचा किरण दिसू लागला आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्त विद्यार्थी मोहिमेला यश येत आहे. सलाम फाउंडेशनच्या प्रयत्नांनी राज्यातील ३२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. शालेय विद्यार्थी धूम्रपानासारख्या व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत़ १० ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे़ शाळकरी मुले व्यसनाकडे आकर्षित होत असतील, तर त्यांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यासाठी मुंबईतील सलाम फाउंडेशनने मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये २००३ पासून तंबाखूमुक्तीसाठी अभियान हाती घेतले आहे़ त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असले तरी एकमेव संस्थेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ व्यसनमुक्ती मोहिमेंतर्गत शिक्षण विभागाशी चर्चा, विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षण, शिक्षण अधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि त्यानंतर व्यसनांचे दुष्परिणाम पटवून देण्यासाठी पोस्टर्स प्रदर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे प्रयत्न केले जात आहेत़ सद्य:स्थितीत शाळांच्या १०० यार्ड परिसरात असलेल्या पानटपऱ्यांसह अन्य ठिकाणी सहज उपलब्ध होणारी तंबाखू हे एकमेव कारण या प्रयत्नांना खीळ घालत आहे. त्यामुळे विविध शाळांतील विद्यार्थिनींनी अशा टपरीचालकांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा उपक्रम राबविला़ तसेच त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा विकणार नाही, अशी शपथ घेतली. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत़ मात्र, तरीही अनेक शाळांभोवती पानटपऱ्या सुरुअसल्याचे दिसून येते़ शिवाय, एमडीसारख्या अंमली पदार्थाची सर्रास विक्री होत असल्याचे नुकतेच ठाणे परिसरात उघडकीस आले आहे़ राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि अन्न व औषधी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून शाळा परिसर तंबाखू मुक्त करण्याची गरज निर्माण झाली आहे़