शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

सलमान खोटारडा, जखमींना मदत न करताच पळला!

By admin | Updated: May 8, 2015 04:56 IST

अनेकांचा आदर्श व प्रसिद्ध अभिनेता असूनही सलमान खान अपघात झाल्यानंतर जखमींना मदत न करताच पळला. त्याच्यासारख्या अभिनेत्याला मदत करणे सहज शक्य होते. पण

अमर मोहिते, मुंबईअनेकांचा आदर्श व प्रसिद्ध अभिनेता असूनही सलमान खान अपघात झाल्यानंतर जखमींना मदत न करताच पळला. त्याच्यासारख्या अभिनेत्याला मदत करणे सहज शक्य होते. पण त्याने ती केली नाही व पळून गेला. यावरून त्याचे वर्तन काय आहे हे लक्षात येते, असा ठपका सत्र न्यायालयाने ठेवला आहे.हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावताना सत्र न्यायाधीश डी.डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानच्या खोटेपणाचे विस्तृत विश्लेषण २४० पानी निकालपत्रात केले आहे. निकालाची  प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. मुळात अपघात केला नव्हता तर सलमानने तेथे जमलेल्या जमावाला तसे सांगायला हवे होते. तसेच घटनास्थळी पोलीस येईपर्यंत त्याने तेथे थांबायला हवे होते. पण तो पळाला. पळण्याचे कारणच काय होते? एवढेच काय तर आपण काही गैर केले नसल्याचा सलमानचा दावा होता, मग त्याने घटना घडल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठून अपघाताची तक्रार करायला हवी होती. त्याने तसेही केले नाही. असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सलमानचे म्हणणे साफ खोटे आहे. आपण गाडी भरधाव वेगाने चालवत नव्हतो, असा दावा स्वत: सलमाननेच केला आहे; आणि गाडी भरधाव वेगात नसेल तर टायर फुटणे अशक्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.महत्त्वाचे म्हणजे १३ वर्षांनंतर अशोक सिंगने न्यायालयात येऊन सांगितले की, मी गाडी चालवत होतो आणि सलमानचे वडील सलीम खान यांच्या सांगण्यावरून मी हे आता न्यायालयाला सांगतो आहे, अशी पुष्टीही सिंगने जोडली. मात्र स्वत:च्या मुलाला पुढे करून खऱ्या आरोपीला पाठीशी घालण्याचे काम सलीम खान यांनी खरेच केले असावे, याबाबत शंका वाटते. तसेच ड्रायव्हरला वाचवणे सलमानलाही मान्य असावे हे विश्वासार्ह नाही. कारण अपघात झाल्यापासून सिंग हा सलमानच्या घरातच काम करतो आहे. अशा परिस्थितीत सिंग गाडी चालवत होता, हे १३ वर्षांत समोर न येणे अशक्य आहे, असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.विशेष म्हणजे अपघातात एकाचा बळी गेला आहे ही बाब मला नंतर कळाली, असा दावा सलमानने केला. प्रत्यक्षात सिंग गाडी चालवत होता तर अपघातात एकाचे निधन झाले आहे हे सलमानला घटनास्थळीच तत्काळ कळाले असते, असे देखील न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सलमान कसा खोटारडा आहे स्पष्ट झाले आहे.सलमानचा गुन्हा सिद्ध होणे कठीण बाब होती. कारण यातील मुख्य साक्षीदार, त्याचा सुरक्षा रक्षक व पोलीस हवालदार रवींद्र पाटील याचे हा खटला सुरू असतानाच निधन झाले. मात्र न्यायालयाने पाटील याची साक्ष नि:संदेह खरी असल्याचा निर्वाळा दिला .