शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खान हिट अँड रन : महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

By admin | Updated: July 5, 2016 13:41 IST

अभिनेता सलमान खान हिट अँड रनप्रकरणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आता सर्वोच्च न्यायालयात खटला उभा राहणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - हिट अँड रनप्रकरणी उच्च न्यायालयाने जरी सलमान खानची मुक्तता केली असली तरी हे प्रकरण अद्याप संपलेले नसून या खटल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. त्यामुळे लवकरच सर्वोच्च न्यायालयात सलमानविरोधात खटला उभा राहणार असून, त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅकवर टाकण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. 
 
२८ सप्टेंबर २००२ साली वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळ सलमान खानच्या लँड क्रूजर गाडीने फूटपाथवर झोपलेल्या ५ जणांना चिरडले होते, त्यात एकाचा बळी गेला तर इतर काही जण जखमी झाले. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यानंतर सबळ पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने १० डिसेंबर २०१५ रोजी त्याची सुटका केली होती.
मात्र महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारचा हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला असून आता सुप्रीम कोर्टात सलमानविरोधात खटला उभा राहणार आहे. 
 
हिट अँड रन प्रकरणातील जखमीचीही सलमानच्या सुटकेविरोधात याचिका 
दरम्यान सलमानच्या गाडीची ठोकर बसून जखमी झालेल्या नियामत शेखनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. जखमींपैकीच एक असलेल्या शेखने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करत सलमानच्या सुटकेला आक्षेप नोंदवला. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ठोस पुराव्यांना नजरअंदाज करत हायकोर्टाने सलमानला चुकीच्या पद्धतीने दोषमुक्त केल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला.
 
   आणखी वाचा 
(हिट अँड रन’- गाजलेल्या घटना)
(सलमानच्या हिट अँड रनप्रकरणातील फाईल मंत्रालयातील आगीत जळून खाक)