शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

हिट अँड रन प्रकरणी सलमानला ५ वर्षांची शिक्षा

By admin | Updated: May 6, 2015 18:03 IST

बहुचर्चित व गेली तेरा वर्षे चाललेल्या हिट अँड रन खटल्यात सलमान खानला दोषी ठरवण्यात आले असून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - बहुचर्चित व गेली तेरा वर्षे चाललेल्या हिट अँड रन खटल्यात सलमान खानला दोषी ठरवण्यात आले असून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमानला आज कोर्टातूनच तुरूंगात नेण्यात येणार असून सुरक्षेच्या कारणास्तव त्याला आर्थर रोड तुरूंगाऐवजी तळोजा किंवा ठाणे येथील कारगृहात हलवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास न्यायाधीशांनी सलमानला दोषी ठरवले. अपघातावेळी सलमान मद्यप्राशन करून गाडी चालवत होता, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हते असे सांगत कोर्टाने त्याला दोषी ठरवले. तुझ्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत, तुझे काय म्हणणे आहे असा प्रश्न न्यायाधीशांनी सलमानला विचारला असता त्याने काही उत्तर न देता आपले वकील शिवदे यांच्याकडे पाहिले आणि त्यानंतर शिवदे यांनी युक्तिवाद सुरू केला.

सलमानच्या डोळ्यात तरळले अश्रू

सलमान बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात पोचला तेव्हा रिलॅक्स मूडमध्ये होता मात्र  न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तो घामाघूम झाला, त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तर निकाल ऐकून त्याच्या कुटुंबियांची घोर निराशा झाली, त्याच्या आईची तब्येतही बिघडल्याचे समजते. अलविरा, अर्पिता या त्याच्या बहिणींना अश्रू अनावर झाले.  

२८ सप्टेंबर २००२ हिट अँड रन प्रकरण घडले. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. पदपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. 

 

खटल्यातील महत्त्वाच्या तारखा

२८ सप्टेंबर २००२ रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी सलमानला अटक झाली व त्याची जामिनावर सुटकाही झाली.

 

७ आॅक्टोबर २००२ सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी पुन्हा सलमानला अटक झाली व त्यानंतर त्याला जामीनही मंजूर झाला.

 

२००३ बचाव पक्षाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला. सरकारी पक्षाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय सुनावणी न्यायालयावर सोडला.

 

२००६ मध्ये वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचा खटला सुरू.

२०११सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यासाठी सरकारी पक्षाने विशेष न्यायालयात अर्ज केला.

३१ जानेवारी २०१३ - वांद्रे न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यास परवानगी दिली.

२८ एप्रिल २०१४ : सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू झाला.

 

सलमानवरील आरोप

सदोष मनुष्यवध 

भरधाव गाडी चालवणे 

निष्काळजीपणा

गंभीर दुखापत करणे 

 

किरकोळ दुखापत करणे - दोन महिने