शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

सालेमचा निकाल १६ जूनला

By admin | Updated: May 30, 2017 04:24 IST

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल १६ जूनला देणार असल्याचे सोमवारी विशेष टाडा न्यायालयाने जाहीर केले. अबू सालेमसह मुस्तफा डोसा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल १६ जूनला देणार असल्याचे सोमवारी विशेष टाडा न्यायालयाने जाहीर केले. अबू सालेमसह मुस्तफा डोसा, अब्दुल कय्युम, शेख फिरोज खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दिकी आणि करीमुल्ला शेख यांच्याबाबत न्यायालय या दिवशी निकाल देणार आहे.१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला ठोठावलेल्या शिक्षेनुसार त्याला जुलै २०१५ मध्ये फाशी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या खटल्यातील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी १२३ आरोपींवरील खटला पूर्ण केला. त्यानंतर या सात जणांवर खटला चालवला. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची ‘केस बी’ म्हणून या सात जणांवरील खटला चालवण्यात येत आहे. अबू सालेमला पोर्तुगालमधून आणण्यात आले, तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आले. मात्र मला पोलिसांनी अटक केली नसून आपणच तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा डोसा करत आहे. या केसमधील आणखी काही आरोपी अद्याप फरारी आहेत. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असला तरी अद्याप ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.अभिनेता आणि १९९३ च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरवल्याचा आरोप अबू सालेमवर आहे. तर संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर आहे. याच प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुस्तफा डोसावर बॉम्बस्फोट करण्यासाठीचा कट रचल्याचा व त्यासाठी नियोजित स्थळी शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे. तर ताहीरवर या प्रकरणातील अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप आहे. गेली सहा वर्षे खटला सुरूबॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेमला पोर्तुगालमधून तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आली. बॉम्बस्फोटाचा हा दुसरा खटला गेली सहा वर्षे सुरू आहे. पहिल्या खटल्यात १२९ जणांनी दिलेल्या कबुलीजबाबावर सरकारी वकील अवलंबून आहेत. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत १२ बॉम्बस्फोट करण्यात आले. या बॉम्बस्फोटासाठी ३००० कि.ग्रॅ.पेक्षा अधिक आरडीएक्स देशात आणण्यात आले. त्यातील केवळ दहा टक्केच आरडीएक्स वापरण्यात आले. या बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला.