शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

मानखुर्दमध्ये पालिकेच्या पाण्याची विक्री

By admin | Updated: May 17, 2016 03:33 IST

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा राज्यासह मुंबईतदेखील पाण्याची मोठी समस्या रहिवाशांना भेडसावत आहे.

समीर कर्णुक,

मुंबई-गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा राज्यासह मुंबईतदेखील पाण्याची मोठी समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. याचाच फायदा सध्या पाणीमाफिया घेताना दिसत आहेत. मानखुर्दमध्ये पालिकेच्या पाण्याची चोरी करून हे माफिया रहिवाशांना सररास पाणी विकत आहेत. २० लीटर पाण्यासाठी ३५ ते ७५ रुपये हे माफिया घेत असल्याने रहिवाशांना दिवसाला पाण्यासाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा पाणीप्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. शहरातील विविध प्रकल्पांमध्ये बाधित असलेल्या झोपडीधारकांचे शासनाने मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंड परिसरात पुनर्वसन केले आहे. या ठिकाणी म्हाडा आणि एमएमआरडीएच्या ६०पेक्षा अधिक इमारती आहेत. एमएमआरडीएने आणि म्हाडाने या ठिकाणी या प्रकल्पग्रस्तांचे केवळ पुनर्वसन केले; मात्र त्यांना लागणाऱ्या सुविधांकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसभरात केवळ १० मिनिटे पाणी येत असल्याने रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. याचाच फायदा पाणीमाफिया घेत आहेत.एकीकडे रहिवाशांची तहान भागत नसली तरी पाणीमाफियांना मात्र या परिसरात हवे तेवढे पाणी उपलब्ध आहे. येथील चिकूवाडी परिसरात पालिकेची पाइपलाइन फोडून काही पाणीमाफिया पाण्याची चोरी करत आहेत. त्यानंतर याच पाण्याची ते रहिवाशांना थेट घरपोच विक्री करत आहेत. लल्लूभाई कम्पाउंडमध्ये सहा ते सात मजल्याच्या इमारती आहेत. लिफ्ट नसल्याने इतक्या वर पाणी घेऊन जाणे रहिवाशांना शक्य नाही. त्यामुळे पाणीमाफिया या रहिवाशांना घरपोच पाणी पोहोचवत आहेत. प्रत्येक मजल्यासाठी ते १० रुपये वाढवून घेत आहेत. पहिल्या मजल्यावर २० लीटर पाण्यासाठी ३५ रुपये तर दुसऱ्या मजल्यासाठी ४५ रुपये असा या माफियांचा पाण्याचा भाव आहे. घरात पाणीच येत नसल्याने जेवण आणि इतर कामांसाठी रहिवासी २० ते ४० लीटर पाणी रोज विकत घेतात. यासाठी त्यांना रोज शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. अनेकांची दिवसाची कमाई शंभर रुपयेही नसताना त्यांना कमावलेले पूर्ण पैसे पाण्यासाठी खर्च करण्याची वेळ आली आहे. रहिवाशांनी पाण्याच्या या समस्येबाबत पालिका, एमएमआरडीए, म्हाडा आणि येथील स्थानिक नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्यांच्याकडून नेहमीच कानाडोळा होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.