शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

मानखुर्दमध्ये पालिकेच्या पाण्याची विक्री

By admin | Updated: May 17, 2016 03:33 IST

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा राज्यासह मुंबईतदेखील पाण्याची मोठी समस्या रहिवाशांना भेडसावत आहे.

समीर कर्णुक,

मुंबई-गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा राज्यासह मुंबईतदेखील पाण्याची मोठी समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. याचाच फायदा सध्या पाणीमाफिया घेताना दिसत आहेत. मानखुर्दमध्ये पालिकेच्या पाण्याची चोरी करून हे माफिया रहिवाशांना सररास पाणी विकत आहेत. २० लीटर पाण्यासाठी ३५ ते ७५ रुपये हे माफिया घेत असल्याने रहिवाशांना दिवसाला पाण्यासाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा पाणीप्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. शहरातील विविध प्रकल्पांमध्ये बाधित असलेल्या झोपडीधारकांचे शासनाने मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंड परिसरात पुनर्वसन केले आहे. या ठिकाणी म्हाडा आणि एमएमआरडीएच्या ६०पेक्षा अधिक इमारती आहेत. एमएमआरडीएने आणि म्हाडाने या ठिकाणी या प्रकल्पग्रस्तांचे केवळ पुनर्वसन केले; मात्र त्यांना लागणाऱ्या सुविधांकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसभरात केवळ १० मिनिटे पाणी येत असल्याने रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. याचाच फायदा पाणीमाफिया घेत आहेत.एकीकडे रहिवाशांची तहान भागत नसली तरी पाणीमाफियांना मात्र या परिसरात हवे तेवढे पाणी उपलब्ध आहे. येथील चिकूवाडी परिसरात पालिकेची पाइपलाइन फोडून काही पाणीमाफिया पाण्याची चोरी करत आहेत. त्यानंतर याच पाण्याची ते रहिवाशांना थेट घरपोच विक्री करत आहेत. लल्लूभाई कम्पाउंडमध्ये सहा ते सात मजल्याच्या इमारती आहेत. लिफ्ट नसल्याने इतक्या वर पाणी घेऊन जाणे रहिवाशांना शक्य नाही. त्यामुळे पाणीमाफिया या रहिवाशांना घरपोच पाणी पोहोचवत आहेत. प्रत्येक मजल्यासाठी ते १० रुपये वाढवून घेत आहेत. पहिल्या मजल्यावर २० लीटर पाण्यासाठी ३५ रुपये तर दुसऱ्या मजल्यासाठी ४५ रुपये असा या माफियांचा पाण्याचा भाव आहे. घरात पाणीच येत नसल्याने जेवण आणि इतर कामांसाठी रहिवासी २० ते ४० लीटर पाणी रोज विकत घेतात. यासाठी त्यांना रोज शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. अनेकांची दिवसाची कमाई शंभर रुपयेही नसताना त्यांना कमावलेले पूर्ण पैसे पाण्यासाठी खर्च करण्याची वेळ आली आहे. रहिवाशांनी पाण्याच्या या समस्येबाबत पालिका, एमएमआरडीए, म्हाडा आणि येथील स्थानिक नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्यांच्याकडून नेहमीच कानाडोळा होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.