शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बियाण्यांची वाढीव दराने विक्री!

By admin | Updated: June 20, 2016 01:57 IST

लोकमत स्टींग ऑपरेशनदरम्यान बियाण्यांची दरवाढ रद्द करण्याच्या ‘महाबीज’च्या आदेशाला बियाणे विक्रेत्यांद्वारे केराची टोपली दाखवली जात आहे.

अकोला : शेतकर्‍यांच्या रोषानंतर बियाण्यांची दरवाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) घेतला असला, तरीही अकोल्यात वाढीव दरानेच बियाण्यांची विक्री करण्यात येत आहे. 'लोकमत'ने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन'मधून हे वास्तव उघडकीस आले असून आधीच दुष्काळाने पोळलेल्या शेतकर्‍याला महागड्या बियाण्यांच्या खरेदीची तोशिस सोसावी लागत आहे.महाबीजच्या बियाण्यांमध्ये या वर्षी ३५ ते ४५ टक्के वाढ करण्यात आल्यानंतर शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 'महाबीज'ने गतवर्षीच्या दरातच बियाण्यांची विक्री करण्याचा निर्णय शनिवार घेतला. राज्यातील सर्व बियाणे विक्रेत्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून तात्काळ करण्याचे आदेश महाबीज प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.गतवर्षीच्या खरीप हंगामात 'महाबीज'मार्फत तूर १३0 रुपये प्रतिकिलो, मूग १३५ रुपये प्रतिकिलो व उडीद बियाण्याची ११0 रुपये प्रतिकिलो या दराने बियाणे विक्री करण्यात आली होती. मात्र 'लोकमत' चमूने रविवारी शहरातील बियाणे बाजारात दरांची पाहणी केली, त्या वेळी महाबीजच्या तुरीचे दर १५0 ते १७0 रुपये प्रतिकिलो, उडिदाचे दर १६0 ते २00 रुपये प्रतिकिलो, तर मुगाचे दर २१0 रुपये प्रतिकिलो असल्याचे विविध बियाणे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.शेतक-यांना हेलपाटेगतवर्षीच्या दरापेक्षा जास्त दराने ज्या शेतकर्‍यांनी तूर, मूग व उडीद बियाण्याची खरेदी केली आहे, अशा शेतकर्‍यांनी संबंधित कृषी अधिकार्‍यांकडे बियाणे खरेदीची पावती, टॅग व बँक खाते क्रमांक सादर केल्यास फरकाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे महाबीजच्या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र पेरणी तोंडावर आली असताना कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना बिलं सादर करण्याची खटपट शेतकर्‍यांना करावी लागणार आहे.