शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

थकबाकीसह वेतन मिळणार!

By admin | Updated: April 7, 2017 02:09 IST

कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाच्या कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या लढाईत अखेर श्रमजीवी कामगार संघटनेने यश मिळवले.

मुंबई : कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाच्या कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या लढाईत अखेर श्रमजीवी कामगार संघटनेने यश मिळवले. सर्व मागण्या मान्य झाल्याने मुंबई महापालिकेवर आयोजित मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. गेले आठ दिवस सुरू असलेले आंदोलन आणि ७ एप्रिल रोजीच्या नियोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून, या कामगारांना फरकासह किमान वेतन मिळणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत २०० रुपये मिळणाऱ्या कामगारांना यापुढे ५५0 रुपये प्रति दिन वेतन मिळणार आहे.या रुग्णालयामधील २४० कामगार किमान वेतन आणि इतर मूलभूत हक्कांपासून वंचित होते. ठेकेदार एनजीओच्या नावाने या कामगारांची पिळवणूक करत होते. या कामगारांनी आपली व्यथा श्रमजीवी कामगार संघटनेकडे मांडली. त्यानंतर आंदोलन आणि मोर्चाच्या इशाऱ्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने काल सर्व संबंधितांची बैठक घेत कामगारांच्या मागण्यांबाबत महापालिका सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले होते. आयुक्तांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांना थकबाकीसह किमान वेतन देण्याबाबत तातडीने आदेश दिले; आणि यापुढे एकाही कामगाराचे वेतन रोखीने किंवा धनादेशाने न देता आरटीजीएस प्रणालीने किमान वेतनाच्या आधीन राहून वेतन दिले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करत यापुढे कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाणार नसल्याचे या वेळी आयुक्तांनी आश्वासित केले. सर्व मागण्या मान्य झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष वेतन कामगारांच्या खात्यात येत्या दोन दिवसांत जमा होणे अभिप्रेत आहे. या कामगारांच्या शोषणाविरोधात श्रमजीवी कामगार संघटनेने मुंबई महापालिकेवर आयोजित केलेला मोर्चा मागण्या मान्य झाल्याने तूर्तास स्थगित केल्याचेही या वेळी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी जाहीर केले. मुंबई महापालिकेतील इतर हजारो कंत्राटी कामगार योग्यरीत्या संघटित झाले तर त्यांचेही प्रश्न सोडविण्यासाठी लढण्याची तयारी असल्याचेही पंडित म्हणाले. (प्रतिनिधी)>आयुक्तांचे आश्वासनकामगारांना थकबाकीसह किमान वेतन देण्याबाबत तातडीने आदेश दिले; आणि यापुढे एकाही कामगाराचे वेतन रोखीने किंवा धनादेशाने न देता आरटीजीएस प्रणालीने किमान वेतनाच्या आधीन राहून वेतन दिले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.