शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीसह वेतन मिळणार!

By admin | Updated: April 7, 2017 02:09 IST

कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाच्या कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या लढाईत अखेर श्रमजीवी कामगार संघटनेने यश मिळवले.

मुंबई : कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाच्या कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या लढाईत अखेर श्रमजीवी कामगार संघटनेने यश मिळवले. सर्व मागण्या मान्य झाल्याने मुंबई महापालिकेवर आयोजित मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. गेले आठ दिवस सुरू असलेले आंदोलन आणि ७ एप्रिल रोजीच्या नियोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून, या कामगारांना फरकासह किमान वेतन मिळणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत २०० रुपये मिळणाऱ्या कामगारांना यापुढे ५५0 रुपये प्रति दिन वेतन मिळणार आहे.या रुग्णालयामधील २४० कामगार किमान वेतन आणि इतर मूलभूत हक्कांपासून वंचित होते. ठेकेदार एनजीओच्या नावाने या कामगारांची पिळवणूक करत होते. या कामगारांनी आपली व्यथा श्रमजीवी कामगार संघटनेकडे मांडली. त्यानंतर आंदोलन आणि मोर्चाच्या इशाऱ्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने काल सर्व संबंधितांची बैठक घेत कामगारांच्या मागण्यांबाबत महापालिका सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले होते. आयुक्तांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांना थकबाकीसह किमान वेतन देण्याबाबत तातडीने आदेश दिले; आणि यापुढे एकाही कामगाराचे वेतन रोखीने किंवा धनादेशाने न देता आरटीजीएस प्रणालीने किमान वेतनाच्या आधीन राहून वेतन दिले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करत यापुढे कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाणार नसल्याचे या वेळी आयुक्तांनी आश्वासित केले. सर्व मागण्या मान्य झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष वेतन कामगारांच्या खात्यात येत्या दोन दिवसांत जमा होणे अभिप्रेत आहे. या कामगारांच्या शोषणाविरोधात श्रमजीवी कामगार संघटनेने मुंबई महापालिकेवर आयोजित केलेला मोर्चा मागण्या मान्य झाल्याने तूर्तास स्थगित केल्याचेही या वेळी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी जाहीर केले. मुंबई महापालिकेतील इतर हजारो कंत्राटी कामगार योग्यरीत्या संघटित झाले तर त्यांचेही प्रश्न सोडविण्यासाठी लढण्याची तयारी असल्याचेही पंडित म्हणाले. (प्रतिनिधी)>आयुक्तांचे आश्वासनकामगारांना थकबाकीसह किमान वेतन देण्याबाबत तातडीने आदेश दिले; आणि यापुढे एकाही कामगाराचे वेतन रोखीने किंवा धनादेशाने न देता आरटीजीएस प्रणालीने किमान वेतनाच्या आधीन राहून वेतन दिले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.