शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

संतच उभारणार राममंदिर !

By admin | Updated: October 6, 2015 02:36 IST

अनेक वर्षांपासून अयोध्येत राममंदिर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी

जळगाव : अनेक वर्षांपासून अयोध्येत राममंदिर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे काम मुळीच करू शकत नाहीत. राममंदिर हे केवळ संत-महंतच उभारू शकतात, असा दावा द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सोमवारी येथे केला. राममंदिर बांधणे हे आमचे स्वप्न असून, लवकरच ते सत्यात उतरविणार आहोत़ त्यासाठी राजकीय पक्षांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही, असेही स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले. अयोध्या येथील राममंदिरात मशीद होती याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यामुळे तेथे केवळ राममंदिर व्हावे, यासाठी आम्ही काम करीत आहोत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळ््यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे. कुंभमेळ््याचे नियोजन चांगले होते. सिंहस्थात एकत्र आलेल्या सनातन धर्मीयांनी एकतेचा संदेश दिला, असेही त्यांनी सांगितले.राज्यात गोहत्या बंदी करण्यात आली. ती देशभरात होणे गरजेचे आहे. सत्तेसाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये होणारी भांडणे थांबविली पाहिजे. हिंदू धर्मात राम, कृष्ण असे विविध देव, देवता असताना साईबाबांची गरज काय, असा सवालही केला. (प्रतिनिधी)गोदामाईला शुद्ध करण्याची गरज काय ? कुंभमेळ््यातील पर्वणी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवरातील तीर्थ गोदावरी नदीत टाकले. गोदावरी नदी ही पवित्र व शुद्ध आहे. हे तीर्थ आणून तिला शुद्ध करण्याची काहीही गरज नव्हती, असे सांगत स्वरूपानंदांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली.व्यक्ती धर्मनिरपेक्षराहूच शकत नाही ! सनातनवर बंदी हवी की नको, या प्रश्नावर ते म्हणाले की, सरकार हे धर्मनिरपेक्ष राहील; मात्र व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. सनातन संस्था काय आहे, हे माहीत नाही. मात्र आम्ही सनातन आहोत. विचारपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.