शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

संततधारेने शहरवासीयांची तारांबळ

By admin | Updated: September 21, 2016 03:13 IST

सोमवारपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नागरिकांचे हाल झाले.

नवी मुंबई : सोमवारपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नागरिकांचे हाल झाले. नवी मुंबईबरोबरच खारघर, पनवेल, उरण परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारपासून वातावरणात काहीसा बदल झाला असून हवेत गारवा पसरला आहे. सकाळी कामावर जाणार नोकरदारवर्ग, शाळकरी विद्यार्थ्यांची मात्र तारांबळ उडाली, पावसाने क्षणभरही विश्रांती न घेतल्याने भुयारी मार्ग,बसस्थानके तसेच सखल पाणी साचल्याच्या घटना घडल्या.पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती त्यामूळे प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील टेकडीवर असलेले मोठे वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. महापालिका आपत्कालीन विभाग तसेच अग्नीशमन दलाच्या वतीने या ठिकाणी तात्काळ भेट देऊन प्रवाशांच्या मार्गातील अडथळा दूर केला. सकाळी साडेआठ वाजेपासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत बेलापूर विभागात ४५.० मिमी, नेरुळमध्ये ४७.०मिमी, वाशीत ६१.५ मिमी, ऐरोलीत ५४.०२ मिमी असा एकूण ५२.०२ मिमी पावसाची नोंद झाली. मोरबे धरणची जलपातळी ८३.४८मीटर इतकी नोंद झाली. ऐरोली सेक्टर ५ येथील मार्केट परिसरात कचरा अडकून नाला तुंबल्याची घटना घडली. रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु असल्याने रेल्वे प्रवाशांना फारसा अडचणींचा सामना करावा लागला नाही. खड्ड्यांमुळे सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांचे हाल झाले.