शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राज्यपालांनी भाजपलादेखील दिली नाही वेळ वाढवून: मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 11:00 IST

फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याचा खुलासा खुद्द भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

शिवसेनेला दिलेल्या मुदतीच्या आत पाठींब्याचे पत्र सादर करता न आल्याने त्यांनी राज्यपाल यांच्याकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र ती राज्यपालांनी नाकारली होती. त्यांनतर राज्यपालांवर शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेसकडून पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपला सुद्धा 24 तासाच्या वरती वेळ देता येणार नसल्याचे राज्यपालांकडून सांगण्यात आले होते, याचा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही मागणी करून सुद्धा आम्हाला वेळ वाढवून मिळाला नसल्याचे सुद्धा मुनगंटीवार म्हणाले आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी मंगळवारी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली होती. मात्र ती मुदत संपण्याआधीच राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालांनी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली होती.

शिवसेना राष्ट्रवादीला वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला असल्याचे बोलले जात असताना, भाजपला सुद्धा वेळ वाढवून देण्यासा राज्यपालांनी नकार दिला असल्याचे समोर आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले की, राज्यपालांकडे आम्ही वेळ वाढवून देण्याची लिखित स्वरूपात मागणी केली होती. मात्र त्यांनी आम्हाला वेळ वाढवून देण्यासा नकार दिला होता. तसेच 24 तासाच्या वरती कुणालाच वेळ देता येणार नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले असल्याचे सुद्धा ते म्हणाले.