शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्यपालांनी भाजपलादेखील दिली नाही वेळ वाढवून: मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 11:00 IST

फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याचा खुलासा खुद्द भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

शिवसेनेला दिलेल्या मुदतीच्या आत पाठींब्याचे पत्र सादर करता न आल्याने त्यांनी राज्यपाल यांच्याकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र ती राज्यपालांनी नाकारली होती. त्यांनतर राज्यपालांवर शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेसकडून पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपला सुद्धा 24 तासाच्या वरती वेळ देता येणार नसल्याचे राज्यपालांकडून सांगण्यात आले होते, याचा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही मागणी करून सुद्धा आम्हाला वेळ वाढवून मिळाला नसल्याचे सुद्धा मुनगंटीवार म्हणाले आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी मंगळवारी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली होती. मात्र ती मुदत संपण्याआधीच राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालांनी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली होती.

शिवसेना राष्ट्रवादीला वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला असल्याचे बोलले जात असताना, भाजपला सुद्धा वेळ वाढवून देण्यासा राज्यपालांनी नकार दिला असल्याचे समोर आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले की, राज्यपालांकडे आम्ही वेळ वाढवून देण्याची लिखित स्वरूपात मागणी केली होती. मात्र त्यांनी आम्हाला वेळ वाढवून देण्यासा नकार दिला होता. तसेच 24 तासाच्या वरती कुणालाच वेळ देता येणार नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले असल्याचे सुद्धा ते म्हणाले.