शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षा भक्कम

By admin | Updated: December 4, 2014 03:03 IST

२६/११ हल्ल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षा मजबूत करण्यात आली असून, मुंबईला कुठलाही धोका नसल्याचे पश्चिम विभागाचे कमांडिंग आॅफिसर व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा यांनी सांगितले.

मुंबई : २६/११ हल्ल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षा मजबूत करण्यात आली असून, मुंबईला कुठलाही धोका नसल्याचे पश्चिम विभागाचे कमांडिंग आॅफिसर व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा यांनी सांगितले. नौदल सप्ताहानिमित्त नौदलाकडून आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युध्दनौकेवर चोप्रा यांच्याशी वार्तालाप ठेवण्यात आला होता. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. नौदलाच्या परवानगीशिवाय मुंबईच्या किनाऱ्यावर अनोळखी युध्दनौका घुसू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील समुद्रातून व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात जहाजांची वाहतूक वाढली आहे. ही वाहतूक वाढली तरी नौदल आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडत आहे. मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्याही मुंबईतील किनाऱ्यांवर वाढली आहे. यातील बोटींना काही अडचण आल्यास त्याची माहिती घेण्यासाठी आधुनिक यंत्रणा कार्यान्वितही करण्यात आल्याचे चोप्रा यांनी सांगितले. सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका असलेली आयएनएस विक्रमादित्य नौदलात दाखल झाल्यामुळे नौदलाची ताकदही वाढली आहे. भारताचे आरमार हे जगातील सर्वात मोठे असे पाचवे आरमार असून दुप्पट विमाने, हेलिकॉप्टर आणि २00 युध्दनौका आहेत. मात्र या संख्याबळावरून ताकद ठरवणे चुकीचे असून त्याची क्षमता किती आहे यावरून ताकद समजते, असेही चोप्रा यांनी मत यावेळी मांडले.