शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जंजिऱ्यात पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

By admin | Updated: May 18, 2016 02:50 IST

पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजचे १४ विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता.

मुरुड-जंजिरा : पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजचे १४ विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता. सध्या सुटी असल्याचे मुरुड-जंजिऱ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र अजूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत आहेत. त्यांना नियंत्रित करताना बोटमालकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. दुसरीकडे काशीद समुद्रकिनारी खोल पाण्यात ओढले गेलेल्या पर्यटकांना सोमवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचविण्यात आले. त्यामुळे प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. उन्हाळी सुटीमुळे पर्यटकांची मुरु ड-जंजिराच्या पर्यटनस्थळी विशेषत: जंजिरा किल्ला पाहायला गर्दी होत आहे. गेल्या काही पावसाच्या संकेतामुळे समुद्रही खवळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्याजवळ उतरणे म्हणजे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. शिडाची बोट एकाच वेळी सात-आठ फूट उंच झेपावते तर क्षणार्धात तेवढ्याच वेगाने खाली येते. अशा वेळी होडीतील कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना बकोट धरून अवजड सामानाप्रमाणे धरपकड करीत उतरवले जाते. यात महिला पर्यटकांवर अधिक नामुष्की येते. भयानक लाटांच्या तडाख्यांत पर्यटक उतरण्याचा प्रयत्न करताना बोट गडाच्या तटबंदीवर आदळते, तर कधी खडकाळ पायरीवर आदळते. अनेकदा पर्यटक पाण्यात पडण्याचे प्रकारही घडले आहेत. या परिस्थितीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरातत्त्व विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. एकावेळी शेकडो पर्यटक किल्ल्याच्या सगळ्या पायरीवर गर्दी करीत असल्याने महिला, लहानगी मुले व ज्येष्ठांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारत येत नाही. वर्षोनुवर्षे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत या ठिकाणी चिंचवडमधून आलेल्या अजय कुलकर्णी या पर्यटकाने मांडले. मुंबईहून आलेले मनजित सिंग यांनी लोक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. मात्र प्रशासनाकडून सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना दिल्या जात नसल्याने जीवाचा धोका उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरामध्ये लाखो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. त्यांची सुरक्षा प्रशासनाकडून राखली जात नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ शौचालये बांधून अनेक वर्षे झाली, पण ही शौचालये सुरूच करण्यात आलेली नाहीत. मुरु ड-जंजिरा समुद्रकिनारा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित किनारा आहे. पण काशीद समुद्रकिनारा निसर्गत: खोलगट आहे. दरवर्षी ओहोटीच्यावेळी पर्यटक समुद्रामध्ये खेचले गेल्याचे अनेक प्रसंग घडतात. सोमवारी अशाच प्रसंगामध्ये ग्रामस्थांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले.