शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जंजिऱ्यात पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

By admin | Updated: May 18, 2016 02:50 IST

पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजचे १४ विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता.

मुरुड-जंजिरा : पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजचे १४ विद्यार्थी बुडाल्याच्या घटनेमुळे येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला होता. सध्या सुटी असल्याचे मुरुड-जंजिऱ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र अजूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत आहेत. त्यांना नियंत्रित करताना बोटमालकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. दुसरीकडे काशीद समुद्रकिनारी खोल पाण्यात ओढले गेलेल्या पर्यटकांना सोमवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचविण्यात आले. त्यामुळे प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. उन्हाळी सुटीमुळे पर्यटकांची मुरु ड-जंजिराच्या पर्यटनस्थळी विशेषत: जंजिरा किल्ला पाहायला गर्दी होत आहे. गेल्या काही पावसाच्या संकेतामुळे समुद्रही खवळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जंजिरा किल्ल्याजवळ उतरणे म्हणजे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. शिडाची बोट एकाच वेळी सात-आठ फूट उंच झेपावते तर क्षणार्धात तेवढ्याच वेगाने खाली येते. अशा वेळी होडीतील कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना बकोट धरून अवजड सामानाप्रमाणे धरपकड करीत उतरवले जाते. यात महिला पर्यटकांवर अधिक नामुष्की येते. भयानक लाटांच्या तडाख्यांत पर्यटक उतरण्याचा प्रयत्न करताना बोट गडाच्या तटबंदीवर आदळते, तर कधी खडकाळ पायरीवर आदळते. अनेकदा पर्यटक पाण्यात पडण्याचे प्रकारही घडले आहेत. या परिस्थितीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरातत्त्व विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. एकावेळी शेकडो पर्यटक किल्ल्याच्या सगळ्या पायरीवर गर्दी करीत असल्याने महिला, लहानगी मुले व ज्येष्ठांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारत येत नाही. वर्षोनुवर्षे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत या ठिकाणी चिंचवडमधून आलेल्या अजय कुलकर्णी या पर्यटकाने मांडले. मुंबईहून आलेले मनजित सिंग यांनी लोक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. मात्र प्रशासनाकडून सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना दिल्या जात नसल्याने जीवाचा धोका उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरामध्ये लाखो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. त्यांची सुरक्षा प्रशासनाकडून राखली जात नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ शौचालये बांधून अनेक वर्षे झाली, पण ही शौचालये सुरूच करण्यात आलेली नाहीत. मुरु ड-जंजिरा समुद्रकिनारा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित किनारा आहे. पण काशीद समुद्रकिनारा निसर्गत: खोलगट आहे. दरवर्षी ओहोटीच्यावेळी पर्यटक समुद्रामध्ये खेचले गेल्याचे अनेक प्रसंग घडतात. सोमवारी अशाच प्रसंगामध्ये ग्रामस्थांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवले.