शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सदोष मनुष्यवधाची शिक्षा रद्द

By admin | Updated: July 19, 2015 02:05 IST

कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने

मुंबई : कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने अपीलात रद्द केली. ही याचिका प्रलंबित असताना आरोपींचा मृत्यू झाला. मात्र आरोपींनी पीडितांना जीवे मारण्याच्या हेतूनेच विषारी दारू विकली होती हे सिद्ध झालेले नाही, असेही न्या. अभय ठिपसे यांनी सात पानी निकालपत्रात नमूद केले आहे.शेवंताबाई राऊत व जयपाल माने अशी या आरोपींची नावे आहेत. २०-२३ मे १९८९ या काळात त्यांच्याकडील दारू पिऊन १३ जणांचा बळी गेला. या प्रकरणी पाच जणांवर सदोष मनुष्यवधासह इतर आरोप ठेवण्यात ठेवले. कोल्हापूर सत्र न्यायालयाने पाचपैकी दोन आरोपींना सदोष मनुष्यवधासाठी १० वर्षांची शिक्षा ठोठावली. याविरोधात या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती. सदोष मनुष्यवधाच्या आरोपासाठी शिक्षा ठोठावताना आरोपीचा हेतू हत्या करण्याचाच होता हेही सिद्ध होणे आवश्यक आहे. हे या प्रकरणात सिद्ध झालेले नाही. तेव्हा आरोपींना सदोष मनुष्यवधासाठी ठोठावलेली शिक्षा रद्द केली जात आहे. ही शिक्षा ठोठावताना आरोपींना काही दंड ठोठावला असल्यास तो त्यांच्या नातलगांना परत करावा, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.