शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

सदोष मनुष्यवधाची शिक्षा रद्द

By admin | Updated: July 19, 2015 02:05 IST

कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने

मुंबई : कोल्हापूर येथे १९८९मध्ये घडलेल्या विषारी दारूकांडाप्रकरणी तेथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने अपीलात रद्द केली. ही याचिका प्रलंबित असताना आरोपींचा मृत्यू झाला. मात्र आरोपींनी पीडितांना जीवे मारण्याच्या हेतूनेच विषारी दारू विकली होती हे सिद्ध झालेले नाही, असेही न्या. अभय ठिपसे यांनी सात पानी निकालपत्रात नमूद केले आहे.शेवंताबाई राऊत व जयपाल माने अशी या आरोपींची नावे आहेत. २०-२३ मे १९८९ या काळात त्यांच्याकडील दारू पिऊन १३ जणांचा बळी गेला. या प्रकरणी पाच जणांवर सदोष मनुष्यवधासह इतर आरोप ठेवण्यात ठेवले. कोल्हापूर सत्र न्यायालयाने पाचपैकी दोन आरोपींना सदोष मनुष्यवधासाठी १० वर्षांची शिक्षा ठोठावली. याविरोधात या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती. सदोष मनुष्यवधाच्या आरोपासाठी शिक्षा ठोठावताना आरोपीचा हेतू हत्या करण्याचाच होता हेही सिद्ध होणे आवश्यक आहे. हे या प्रकरणात सिद्ध झालेले नाही. तेव्हा आरोपींना सदोष मनुष्यवधासाठी ठोठावलेली शिक्षा रद्द केली जात आहे. ही शिक्षा ठोठावताना आरोपींना काही दंड ठोठावला असल्यास तो त्यांच्या नातलगांना परत करावा, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.