शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

सदाभाऊ म्हणजे संघटना नव्हे!

By admin | Updated: May 3, 2017 03:23 IST

कृषीमंत्री सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नसून, ते संघटनेचे एक कार्यकर्ते आहेत. त्यांना शेतकऱ्यांची गरज असेल

सांगली : कृषीमंत्री सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नसून, ते संघटनेचे एक कार्यकर्ते आहेत. त्यांना शेतकऱ्यांची गरज असेल तर,४ मे रोजी कोल्हापुरात निघणाऱ्या मोर्चात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान सदाभाऊंना संघटनेच्या सर्व पदातून मुक्त केल्याचेही त्यांनी जाहीर केले.ते पुढे म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव घेऊनच सदाभाऊंना मंत्रिमंडळात पाठविले आहे. ते राज्यमंत्री असल्यामुळे त्यांचे अधिकार कमी आहेत. हे जरी खरे असले तरी, त्यांनी भाजप सरकारचे उदोउदो करण्याची काहीच गरज नाही. मित्रपक्षाचे मंत्री कसे वागतात तसे त्यांनी वागावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना साखर कारखाने विक्री घोटाळे आणि जलसिंचन घोटाळ्याबद्दल बैलगाडीभर पुरावे असल्याची वल्गना करीत होते. सत्तेवर येताच त्यांना त्यांच्या भाषणांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय ते घेत नाहीत. या सरकारचे कौतुक सदाभाऊंनी करण्याची काहीच गरज नाही. काहीवेळा ते उत्साहाच्या भरात भाजपबद्दल बोलत असतीलही; पण त्यांना सरकारच्या कौतुकाचा सोहळा थांबविण्याचाही आम्ही सल्ला देऊ, अशी बोचरी टीकाही शेट्टी यांनी केली.सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सर्व पदे त्यांच्याकडून काढून घेतली आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आता प्रा. डॉ. प्रकाश पोकळे आहेत. दि. ४ मे रोजी कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. उसाला दुसरा हप्ता ५०० रुपये मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, यासह अन्य मागण्या आहेत.(प्रतिनिधी)प्रतिटन ५०० रुपये द्या, नाही तर आंदोलन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाले, त्यावेळी साखरेला क्विंटलला २८०० रुपये दर होता. यामध्ये एक हजाराची वाढ होऊन आज ३८०० रुपये क्विंटल साखरेचा दर झाला आहे. साखरेच्या वाढीव दराचा शेतकऱ्यांना लाभ झालाच पाहिजे. यामध्ये साखर कारखानदार शेतकऱ्यांवर उपकार करीत नाहीत. दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन ५०० रुपये दर दिला पाहिजे. दरवाढ दिली तर ठीक, नाही तर दि. ४ मेनंतर सरकारच्याविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.