शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआय मंडळ बरखास्त करा!

By admin | Updated: July 1, 2015 03:25 IST

माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, नवनियुक्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी मंत्रालयाकडे करणार

पुणे : माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, नवनियुक्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी मंत्रालयाकडे करणार असल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी राकेश शुक्ला याने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.‘एफटीआयआय’ (फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडिया) नियामक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा मंगळवारी १९वा दिवस होता. आंदोलनाची दखल अखेर केंद्र शासनाकडून घेण्यात आली असून, शुक्रवारी नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. शिष्टमंडळात सात माजी तर तीन आजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. माजी विद्यार्थ्यांमध्ये गिरीश कासारवल्ली, रसुल पोकुट्टी, परेश कामदार, बीना पॉल, फरिदा मेहता, धरम गुलाटी, प्रतीक वत्स तर हरिशंकर नचिमुथ्थु, विकास अर्स, सीमा कौर या सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सरकारच्या प्रतिसादावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून, तूर्त आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका असल्याचे विकास अर्स याने सांगितले. चौहान यांना राजकीय विचारप्रणाली आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यांवर आमचा विरोध आहे. संस्थेला मार्ग दाखवणारी व्यक्ती नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडली जावी. एफटीआयसारख्या संस्थांच्या नियामक मंडळावर नियुक्ती करताना कोणते निकष लावण्यात येतात, हे मंत्रालयाला विचारणार आहोत. संबंधित निकष सदोष वाटल्यास आमच्या दृष्टीने योग्य असलेले निकष त्यांना सुचवू, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)