शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

एफटीआय मंडळ बरखास्त करा!

By admin | Updated: July 1, 2015 03:25 IST

माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, नवनियुक्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी मंत्रालयाकडे करणार

पुणे : माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, नवनियुक्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी मंत्रालयाकडे करणार असल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी राकेश शुक्ला याने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.‘एफटीआयआय’ (फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडिया) नियामक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा मंगळवारी १९वा दिवस होता. आंदोलनाची दखल अखेर केंद्र शासनाकडून घेण्यात आली असून, शुक्रवारी नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. शिष्टमंडळात सात माजी तर तीन आजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. माजी विद्यार्थ्यांमध्ये गिरीश कासारवल्ली, रसुल पोकुट्टी, परेश कामदार, बीना पॉल, फरिदा मेहता, धरम गुलाटी, प्रतीक वत्स तर हरिशंकर नचिमुथ्थु, विकास अर्स, सीमा कौर या सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सरकारच्या प्रतिसादावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून, तूर्त आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका असल्याचे विकास अर्स याने सांगितले. चौहान यांना राजकीय विचारप्रणाली आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यांवर आमचा विरोध आहे. संस्थेला मार्ग दाखवणारी व्यक्ती नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडली जावी. एफटीआयसारख्या संस्थांच्या नियामक मंडळावर नियुक्ती करताना कोणते निकष लावण्यात येतात, हे मंत्रालयाला विचारणार आहोत. संबंधित निकष सदोष वाटल्यास आमच्या दृष्टीने योग्य असलेले निकष त्यांना सुचवू, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)