शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सबनीस बोलले, राजकारण तापले !

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. दिवसभरातील घटनाक्रम लक्षात

पिंपरी : देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. दिवसभरातील घटनाक्रम लक्षात घेता, सबनीस यांचा निषेध आणि ‘..तर मोदी एका दिवसात संपला असता; आणि पाडगावकरांआधी त्यांची शोकसभा घ्यावी लागली असती,’ या त्यांच्या वक्तव्याचे समर्थन असा वाद साहित्य संमेलनाच्या मंडपात शिरण्याची चिन्हे आहेत.आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनात ‘समन्वय आणि संवाद’ या विषयावर बोलताना ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य केले. ‘डॉ. सबनीस यांनी माफी मागितली नाही, तर संमेलनात त्यांना पाय ठेवू देणार नाही,’ असा इशारा खासदार अमर साबळे यांनी शुक्रवारी पिंपरीत दिला. काय बोलले सबनीस...संघर्षाच्या जागा आहेत, तिथे असूद्यात. आपण आता संवादाकडे वळूयात. पाकिस्तानातील गुलाम अलींना भारतात येऊद्यात, येथे गाऊद्यात. पंतप्रधान काबूलवरून अचानक पाकमध्ये जातात. त्यांना नवाझ शरीफ यांचा पुळका आलेला नव्हता, तर राष्ट्रासाठी ते गेले. मोदींची गोध्रा हत्याकांड काळातील कारकिर्द कलंकित आहे. मोदी हे शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी शीर तळहातावर घेऊन पाकमध्ये गेले होते. ही मरायची लक्षणे होती. तेथे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. बॉम्बगोळा येऊन पडू शकत होता. तसे झाले असते, तर मोदी एका दिवसात संपला असता आणि पाडगावकरांआधी त्यांची शोकसभा घ्यावी लागली असती, असे वक्तव्य त्यांनी केले होते.पंतप्रधानांच्या काळजीपोटी बोललो - सबनीस नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी, गौतम बुद्ध यांचा अहिंसेचा विचार जागतिकस्तरावर पोहोचवला. त्यांची राष्ट्रभक्ती माझ्या आत्मीयतेचा विषय आहे. त्यांच्या जिवाच्या काळजीपोटी मी सविस्तर भाषण केले. मात्र, विपर्यास करून काही मंडळी माझे अभिव्यक्तीस्वातंत्र्य दाबू पाहत आहेत. या भूमिकेचे परिणाम संमेलनावर होणार नसून, ते भाजपालाच भोगावे लागतील, असे सबनीस म्हणाले.