शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

सीलिंग कायद्याची अफवेमुळे स्टॅम्प खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 01:54 IST

आता सीलिंगचा कायदा येणार असल्याची अफवा पसरली असल्याने शेतक-यांद्वारे स्टॅम्प खरेदी करण्यात येत आहेत.

मयूर गोलेच्छा लोणार, दि. १८- चलनबंदीच्या निर्णयानंतर, आता सीलिंगचा कायदा येणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यातच कुटुंबातील सदस्यांची जमीन कुटुंबातील सदस्यांच्या नावे करण्यासाठी खरेदी दाखविण्याची गरज नसल्याचा निर्णयही शासनाने दिला आहे. त्यामुळेदेखील नागरिकांनी स्टॅम्प खरेदीसाठी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी चलनात असलेल्या १ हजार आणि ५00 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. या निर्णयानंतर सोशल मीडियावर या निर्णयाच्या बाजूने आणि विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर शेतकरीविरोधी सीलिंग कायदा लागू होणार असल्याच्या अफवांना मोठय़ा प्रमाणावर पेव फुटले आहे. यामुळे शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली असून, या कायद्यामुळे १५ एकरांपेक्षा जास्त कोरडवाहू शेतजमीन तसेच १0 एकरांपेक्षा अधिक ओलिताखालील शेतजमीन सरकारजमा होण्याच्या भीतीने शेतकर्‍यांनी १५ नोव्हेंबरपासून आपल्याकडील शेती कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने वाटणीपत्रक करून घेण्यासाठी स्टॅम्प खरेदी करून तलाठय़ांकडे गर्दी करायला सुरुवात केली आहे. यामुळे तलाठय़ांना डोकेदुखी सुरू झाली आहे. सीलिंग कायद्याच्या अंमलबजावणीच्या अफवेने स्टॅम्प विक्रेत्यांना मात्र चांगलाच नफा मिळत आहे. जोरदार स्टॅम्प विक्रीमुळे स्टॅम्प पेपरचा तुटवडा जाणवू लागला आहे. आधीच नोट बंदीमुळे त्रस्त असलेला सर्वसामान्य शेतकरी शेतजमिनीच्या वाटणी पत्रकाकरिता १00 रुपयाचा स्टॅम्प १५0 रुपये ते २00 रुपयाला खरेदी करीत आहेत. तीन वषार्ंपूर्वी आघाडी सरकारच्या काळात मनमोहन सरकारने राज्यात सीलिंग कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध करून राज्यात सीलिंग कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतला होता. देशातील पश्‍चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांनी आधीच सीलिंग कायद्याला विरोध करून आपल्या राज्यात सीलिंग कायदा लागू केलेला नाही. सीलिंग कायदा लागू होण्याच्या भीतीने शेतकर्‍यांनी १00 रुपयांचे स्टॅम्प घेण्यासाठी गर्दी केली असली, तरी शासन निर्णयानुसार १00 रुपयाच्या स्टॅम्पवर शेतजमिनीचे वाटणीपत्रक तलाठय़ाकडे करता येत नाही. १00 रुपयाच्या स्टॅम्पवर वाटणीपत्रक करून घेण्यासाठी शेतकर्‍यांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनच वाटणीपत्रक करून घेण्याची सक्ती राज्य शासनाने केली आहे. -जमीन हा राज्याचा विषय असल्यामुळे तो केंद्र सरकारने जरी लागू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्य विधिमंडळाच्या संमतीशिवाय सीलिंग कायदा राज्यात अंमलात येऊ शकत नाही. यामुळे सीलिंग कायद्याबाबत सोशल मीडियावरून होणार्‍या अफवांवर विश्‍वास ठेवू नका.- प्रा. बळीराम मापारी, तालुका शिवसेनाप्रमुख, लोणार. -नोटबंदीनंतर मोदी सरकार सीलिंग कायदा अंमलात आणणार असल्याच्या अफवेचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेतकरी वर्गात धास्ती पसरली असून, बहुभूधारक शेतकरी आपल्या नावावरील पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन सरकारजमा होण्याच्या भीतीने आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने वाटणी करून घेण्यासाठी गर्दी करू लागले. सदर अफवेवर शेतकर्‍यांनी विश्‍वास ठेवू नये.- संतोष जाधव, तलाठी, देऊळगाव कुंडपाळ.