शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोशल मीडियावरील अफवांचा रेल्वे प्रशासनाला त्रास

By admin | Updated: May 10, 2017 02:41 IST

सोशल मीडियावरील कॉपी पेस्ट आणि अफवांमुळे रेल्वेचे अधिकारी भलतेच त्रस्त झाले आहेत. जुन्याच बातम्या आणि संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियावरील कॉपी पेस्ट आणि अफवांमुळे रेल्वेचे अधिकारी भलतेच त्रस्त झाले आहेत. जुन्याच बातम्या आणि संदेश पुन्हा-पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, त्यांच्या चौकशीसाठी प्रवाशांचे अनेक फोन अधिकाऱ्यांना येत आहेत. त्यामुळे या समस्येला कशा प्रकारे उत्तर द्यावे, या चिंतेत अधिकारी त्रस्त आहेत.सोशल मीडियावरील संदेश वेगाने व्हायरल होतात. संदेशाची सत्यता न पडताळता तो संदेश फॉरवर्ड केला जातो. या व्हायरल मेसेजेसमध्ये ‘दिवा-सावंतवाडी रेल्वे अपघात’, ‘१५ मे पासून मुंबई-मडगाव तेजस वातानुकूलित एक्स्प्रेस धावणार’ या संदेशाचा समावेश आहे. त्याचा त्रास अधिकाऱ्यांसोबत पोलिसांनाही होत आहे.प्रवाशांच्या मनात भीती पसरवण्याच्या उद्देशाने असे संदेश व्हायरल करण्यात येत असल्याचे, रत्नागिरी आरपीएफ इनचार्ज कुलदीप सिंग यांनी सांगितले. सिंग म्हणाले की, दिवा-सावंतवाडी अपघाताच्या बनावट मेसेजमुळे गेल्या दोन दिवसांपासून ४० ते ५० फोन आले आहेत. संबंधित फोन करणाऱ्यांचे नातेवाईक या गाडीने प्रवास करत होते. त्यांचा फोन न लागल्याने खरोखरच अपघात झाला आहे का? याची विचारणा ते करत होते. त्यामुळे अशा संदेश आणि छायाचित्रांमुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सिंग यांनी केले आहे.बहुचर्चित ‘मुंबई-मडगाव वातानुकूलित तेजस एक्स्प्रेस’ १५ मे रोजी सुरू होणार आहे, अशा संदेशामुळे प्रवासी संभ्रमावस्थेत असल्याचे आढळून आले. तेजस एक्स्प्रेस कधी सुरू होणार? याबाबतची माहिती प्रशासनाकडेही नाही. चुकीचे संदेश पसरवून प्रवाशांची दिशाभूल केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रवाशांनी असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे सांगत, या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाला चौकशीचे आदेश दिल्याचेही मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.‘दिवा-सावंतवाडी अपघात’दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला नागोठाण्याजवळ अपघात झाला आहे. भिसेखिंडजवळ बोगद्यात काही डबे तर काही डबे बोगद्याबाहेर आहेत. दरम्यान, घटनास्थळी अद्याप कोणीही आलेले नसून, कुर्ला आणि कल्याणहून मेडिकल रिलिफ ट्रेन रवाना झाल्या आहेत.‘मुंबई -गोवा जलद प्रवास’१५ मे पासून मुंबई-मडगाव वातानुकूलित एक्स्प्रेस सुरू होत आहे. ताशी १६० किमी वेगाने ही पंचतारांकित ट्रेन धावणार असून, भाडे शुल्क ७० टक्क्यांनी कमी असणार आहे. मुंबईहून सकाळी ९.३० वाजता सुटणारी ट्रेन मडगावला १८.३० वाजता पोहोचेल.