शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सत्ताधारीच आमने-सामने

By admin | Updated: October 19, 2016 04:22 IST

आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप करीत लवकरच एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा पवित्रा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी घेतला

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अतिरिक्त पाण्याचा कोटा देण्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप करीत लवकरच एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा पवित्रा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी घेतला आहे. अतिरिक्त कोट्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. यामुळे रस्ते विकासासह अतिरिक्त पाण्याच्या कोट्यावरूनही केडीएमसीतील हे सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.२७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पाण्याअभावी लागू झालेल्या पाणीकपातीत १७ ते १८ दशलक्ष लीटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडूनही आजघडीला पिण्याच्या पाण्याची कमतरता २७ गावांमध्ये भेडसावत आहे. महिनाभरापूर्वी ग्रामीण भागातील भाजपाच्या नगरसेवकांनी जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त ३० दशलक्ष लीटर पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. यावर, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लीटर पाणी देऊ, या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परंतु, जलसंपदामंत्र्यांनी आदेश देऊन एक महिना उलटला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही, याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे. जो कोटा होता, त्यातही कपात केल्याने पाणीटंचाईची भीषण परिस्थिती गावांमध्ये उद्भवली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यांसदर्भात खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही पत्रव्यवहार करून अतिरिक्त पाण्याच्या कोट्याकडे लक्ष वेधल्याचे भोईर यांनी सांगितले. परंतु, याची अंमलबजावणी न झाल्याने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले. बारवी धरणाची उंची वाढल्याने दीडपट पाणी वाढले, त्याचे काय झाले, असा सवालही भोईरांनी केला आहे. >सेना शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांच्या भेटीला एकीकडे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अपुऱ्या पाणी कोटयासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला असताना मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ गावांसाठी अतिरीक्त २० दशलक्ष लिटर पाणी द्यावे अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना केली. यावर महाजन यांनी २० दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे आदेश एमआयडीसीला दिले असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. शिष्टमंडळात महापौर देवळेकरांसह सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीणचे प्रकाश म्हात्रे, सुखदेव पाटील, एकनाथ पाटील उपस्थित होते. महाजन यांच्या निर्णयामुळे २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होणार असल्याचे देवळेकर म्हणाले.