शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

सत्ताधारीच आमने-सामने

By admin | Updated: October 19, 2016 04:22 IST

आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप करीत लवकरच एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा पवित्रा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी घेतला

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अतिरिक्त पाण्याचा कोटा देण्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप करीत लवकरच एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा पवित्रा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी घेतला आहे. अतिरिक्त कोट्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. यामुळे रस्ते विकासासह अतिरिक्त पाण्याच्या कोट्यावरूनही केडीएमसीतील हे सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.२७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पाण्याअभावी लागू झालेल्या पाणीकपातीत १७ ते १८ दशलक्ष लीटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडूनही आजघडीला पिण्याच्या पाण्याची कमतरता २७ गावांमध्ये भेडसावत आहे. महिनाभरापूर्वी ग्रामीण भागातील भाजपाच्या नगरसेवकांनी जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त ३० दशलक्ष लीटर पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. यावर, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लीटर पाणी देऊ, या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परंतु, जलसंपदामंत्र्यांनी आदेश देऊन एक महिना उलटला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही, याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे. जो कोटा होता, त्यातही कपात केल्याने पाणीटंचाईची भीषण परिस्थिती गावांमध्ये उद्भवली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. यांसदर्भात खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही पत्रव्यवहार करून अतिरिक्त पाण्याच्या कोट्याकडे लक्ष वेधल्याचे भोईर यांनी सांगितले. परंतु, याची अंमलबजावणी न झाल्याने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले. बारवी धरणाची उंची वाढल्याने दीडपट पाणी वाढले, त्याचे काय झाले, असा सवालही भोईरांनी केला आहे. >सेना शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांच्या भेटीला एकीकडे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अपुऱ्या पाणी कोटयासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला असताना मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ गावांसाठी अतिरीक्त २० दशलक्ष लिटर पाणी द्यावे अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना केली. यावर महाजन यांनी २० दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे आदेश एमआयडीसीला दिले असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. शिष्टमंडळात महापौर देवळेकरांसह सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीणचे प्रकाश म्हात्रे, सुखदेव पाटील, एकनाथ पाटील उपस्थित होते. महाजन यांच्या निर्णयामुळे २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होणार असल्याचे देवळेकर म्हणाले.