शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

पाण्यावर नियमांचे बोट!

By admin | Updated: November 1, 2015 01:45 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोकळा केला असला, तरी ‘फक्त पिण्यासाठी

अहमदनगर : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोकळा केला असला, तरी ‘फक्त पिण्यासाठी पाणी सोडावे’ या आदेशामुळे नवा संभ्रम निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. प्रशासन यंत्रणा याचा ‘नेमका’ अर्थ काढण्यात शनिवारी गुंतली होती, तर महावितरण आणि पोलीस दल ऐन दिवाळीत लोडशेडिंग व बंदोबस्त कसा द्यावा, यावरून पेचात आहे. त्यामुळे पाणी सोडण्याचा मुहूर्त लांबणीवर पडेल, अशी चिन्हे आहेत. राज्य जल नियामक प्राधिकरणाने १७ आॅक्टोबरला समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार, जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. संगमनेरचा थोरात सहकारी साखर कारखाना व हरिश्चंद्र पाणी वापर सहकारी संस्थेने, या आदेशाकडे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे लक्ष वेधले आहे. प्राधिकरणाचा १७ नोव्हेंबरचा आदेश समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार होता. मात्र, न्यायालयाने केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडता येईल, असे आदेश दिल्याचे ३१ नोव्हेंबरला हरकत अर्जातून कळविले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत शनिवारी पाटबंधारे विभागाचे नाशिक येथील अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे यांना प्राप्त झाली. त्यांनी आदेशाच्या प्रती नगर येथील कार्यकारी अभियंता आनंद वडार यांना पाठवल्या. वडार यांनी आदेशाची प्रत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना सादर केली. त्यावर जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली. जायकवाडीला प्रत्यक्षात पाणी सोडणे आणि पिण्यासाठी पाणी सोडणे यात फरक असून, दोन्हीची कार्यपद्धती आणि प्रक्रिया वेगवेगळी असल्याने, जिल्हा प्रशासनाने नियमांचा अभ्यास सुरू केला होता. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाणी सोडण्याबाबत कोणताच निर्णय होऊ शकलेला नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) साखर कारखान्यांकडून आव्हानराज्य जल नियामक प्राधिकरणाने १७ आॅक्टोबरला समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता.त्याला आव्हान देणाऱ्या याचिका जिल्ह्यातील साखर कारखाने व सहकारी संस्थांकडून उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.