शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नियम बदलून न्यायाधीशांना घरे

By admin | Updated: August 18, 2015 01:15 IST

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या विद्यमान न्यायाधीशांना मुंबईत एकाच इमारतीत म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने नियमांत बदल केला आहे

संदीप प्रधान, मुंबईउच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या विद्यमान न्यायाधीशांना मुंबईत एकाच इमारतीत म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने नियमांत बदल केला आहे. उपलब्ध माहितीनुसार नियमांत बदल करणारा हा शासन निर्णय (जीआर) १२ आॅगस्ट रोजी निघण्याआधीच न्यायाधीशांच्या या घरांसाठी ओशिवरा येथील भूखंड निश्चित झाला असून, न्यायाधीशांनी सहकारी सोसायटी स्थापन करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत.लाभार्थींच्या एखाद्या विशिष्ट गटासाठी म्हाडा स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबवू शकते. यासंबंधीचे धोरण महाराष्ट्र गृहनिर्माण (मिळकत व्यवस्थापन, विक्री, हस्तांतरण आणि सदनिकांची अदलाबदल) विनियम १९८१ अन्वये निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाने आता एक ‘जीआर’ काढून या नियमावलीच्या नियम क्र. १३(२)मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार आता सर्वोच्च, उच्च व कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांचा स्वतंत्र संवर्ग तयार केला आहे. या संवर्गातील न्यायाधीश एकत्रितपणे किंवा न्यायाधीशांच्या वेगवेगळ््या संवर्गासाठी गृहनिर्माण योजना राबवल्या जाऊ शकतात.सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे प्रस्तावित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदत्वासाठीचे अर्ज संबंधित न्यायालयाच्या महाप्रबंधकांकडून मागविण्यात यावेत. तसेच जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांचे अर्ज संबंधित न्यायालयाच्या निबंधकांकडून मागविण्यात यावेत, असेही या ‘जीआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे.शासनाच्या २५ एप्रिल २०११ च्या शासन निर्णयात अशा वेगवेगळ््या गटांकरिता घरे देताना जाहिरात देणे व लॉटरीद्वारे घरांचे वितरण करणे अनिवार्य करण्यात आले होते. स्वातंत्र्यसैनिक, अंध-अपंग, सैन्य दलातील जवान, निवृत्त जवान, आजी-माजी आमदार, पत्रकार अशा संवर्गातील इच्छुकांना जाहिरात देऊन व लॉटरीद्वारे घरे दिली जातात. मात्र आता सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी विशेष गृहनिर्माण योजना राबविताना जाहिरात देण्याचे व लॉटरी काढण्याचे बंधन म्हाडावर असणार नाही, अशीही दुरुस्ती करण्यात आली आहे.