शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्यांबाबत नियमांना हरताळ

By admin | Updated: October 23, 2015 03:02 IST

राज्यभरातील आंतरजिल्हा बदल्या रखडलेल्या असतानाच आदिवासी जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बाबतीत मात्र नियमांना हरताळ फासला गेला आहे. तीन वर्षांत बदलीचा नियम

- गजानन दिवाण,  औरंगाबादराज्यभरातील आंतरजिल्हा बदल्या रखडलेल्या असतानाच आदिवासी जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बाबतीत मात्र नियमांना हरताळ फासला गेला आहे. तीन वर्षांत बदलीचा नियम असतानाही १०-१० वर्षांपासून हे शिक्षक एकाच जिल्ह्यात अडकून पडले आहेत. आदिवासी जिल्ह्यात तीन वर्षे नोकरी केल्यानंतर प्राधान्याने आवडीच्या ठिकाणी बदली करावी, असा शासकीय नियम सांगतो. मात्र, कोणत्याही आदिवासी जिल्हा परिषदेकडून या नियमाचे पालन होत नाही. एकदा या जिल्ह्यात शिक्षक रूजू झालाकी, बदलीसाठी कोणीच विचारत नाही. अंबरनाथ जिल्ह्यातील एका शिक्षकाची पत्नी गोंदिया जिल्ह्यात नोकरी करते. त्यांचा मुलगा आणि आई-वडील पुण्यात राहतात. गेल्या आठ वर्षांपासून हा असाच संसार सुरू आहे. मूळचे अकोला जिल्ह्यातील एक शिक्षक १३ वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील किनवट भागात कार्यरत आहेत. २००९पासून त्याचे वडील आपल्या मुलाच्या बदलीची वाट पाहत होते. २०१२मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जवळ कोणीच नसल्याने दवाखान्यातही नेता आले नाही. आॅगस्ट २००९ला त्यांनी एनओसी दाखल केली आहे. त्यांच्याच जात प्रवर्गातील एका मित्राची एका वर्षात अकोल्याला बदली झाली, हे विशेष!पाणी नाही, वीज नाही, मोबाईल नेटवर्क तर विचारायलाच नको. अशा स्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील एका अतिदुर्गम शाळेत गेल्या सहा वर्षांपासून एक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची पत्नी जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. आई, पत्नी आणि लहान मुलगा जळगावात राहतात. जागा रिक्त असूनही जळगाव जि. प. त्यांना स्थान देत नाही.कटू अनुभवसातारा जिल्ह्यातील एक शिक्षक १० वर्षांपासून कुटुंबापासून दूर पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे. रत्नागिरीचा एक शिक्षक गडचिरोली जिल्ह्यात सात वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात, आई-वडील रत्नागिरीला आहेत. अशा अनेक शिक्षकांचा कुटुंबगाडा डळमळीत झाला आहे. नोकरी मिळत नाही, म्हणून धडपड करायची. मिळेल त्या ठिकाणी रूजू व्हायचे. नंतर मात्र कुटुंबापासून दूर असे कुठल्या तरी दुर्गम भागात वर्षानुवर्षे काढायची, अशी स्थिती अनेकांची आहे.