शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्यांबाबत नियमांना हरताळ

By admin | Updated: October 23, 2015 03:02 IST

राज्यभरातील आंतरजिल्हा बदल्या रखडलेल्या असतानाच आदिवासी जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बाबतीत मात्र नियमांना हरताळ फासला गेला आहे. तीन वर्षांत बदलीचा नियम

- गजानन दिवाण,  औरंगाबादराज्यभरातील आंतरजिल्हा बदल्या रखडलेल्या असतानाच आदिवासी जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बाबतीत मात्र नियमांना हरताळ फासला गेला आहे. तीन वर्षांत बदलीचा नियम असतानाही १०-१० वर्षांपासून हे शिक्षक एकाच जिल्ह्यात अडकून पडले आहेत. आदिवासी जिल्ह्यात तीन वर्षे नोकरी केल्यानंतर प्राधान्याने आवडीच्या ठिकाणी बदली करावी, असा शासकीय नियम सांगतो. मात्र, कोणत्याही आदिवासी जिल्हा परिषदेकडून या नियमाचे पालन होत नाही. एकदा या जिल्ह्यात शिक्षक रूजू झालाकी, बदलीसाठी कोणीच विचारत नाही. अंबरनाथ जिल्ह्यातील एका शिक्षकाची पत्नी गोंदिया जिल्ह्यात नोकरी करते. त्यांचा मुलगा आणि आई-वडील पुण्यात राहतात. गेल्या आठ वर्षांपासून हा असाच संसार सुरू आहे. मूळचे अकोला जिल्ह्यातील एक शिक्षक १३ वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील किनवट भागात कार्यरत आहेत. २००९पासून त्याचे वडील आपल्या मुलाच्या बदलीची वाट पाहत होते. २०१२मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जवळ कोणीच नसल्याने दवाखान्यातही नेता आले नाही. आॅगस्ट २००९ला त्यांनी एनओसी दाखल केली आहे. त्यांच्याच जात प्रवर्गातील एका मित्राची एका वर्षात अकोल्याला बदली झाली, हे विशेष!पाणी नाही, वीज नाही, मोबाईल नेटवर्क तर विचारायलाच नको. अशा स्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील एका अतिदुर्गम शाळेत गेल्या सहा वर्षांपासून एक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची पत्नी जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. आई, पत्नी आणि लहान मुलगा जळगावात राहतात. जागा रिक्त असूनही जळगाव जि. प. त्यांना स्थान देत नाही.कटू अनुभवसातारा जिल्ह्यातील एक शिक्षक १० वर्षांपासून कुटुंबापासून दूर पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे. रत्नागिरीचा एक शिक्षक गडचिरोली जिल्ह्यात सात वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात, आई-वडील रत्नागिरीला आहेत. अशा अनेक शिक्षकांचा कुटुंबगाडा डळमळीत झाला आहे. नोकरी मिळत नाही, म्हणून धडपड करायची. मिळेल त्या ठिकाणी रूजू व्हायचे. नंतर मात्र कुटुंबापासून दूर असे कुठल्या तरी दुर्गम भागात वर्षानुवर्षे काढायची, अशी स्थिती अनेकांची आहे.