शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

रखडपट्टीचा मोठा फटका

By admin | Updated: November 29, 2014 23:57 IST

महाराष्ट्राच्या नव्या सरकारपुढे जी महत्त्वाची आव्हाने उभी आहेत त्यात रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राच्या नव्या सरकारपुढे जी महत्त्वाची आव्हाने उभी आहेत त्यात रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. विकासाचे राजकारण करताना या प्रकल्पांचा फेरआढावा घेत हे प्रकल्प वेगाने कसे पूर्ण होतील यावर भर देणो, ही नव्या सरकारची तातडीची गरज बनली पाहिजे. मुंबईपासून विदर्भार्पयत काही महत्त्वाच्या रखडलेल्या प्रश्नांचा धांडोळा. नव्या सरकारला नव्या दमाने आणि नव्या उमेदीने या प्रकल्पांना हात घालायला हवा तरच विकासाचा खरा वेग प्राप्त होऊ शकेल.
 
देशात रखडलेल्य्ां विकासकामांची मोठी जंत्री आहे. प्रत्येक तिसरा प्रकल्प रखडल्याने प्रकल्पांच्या किमतीत एक लाख कोटीहून अधिकची वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारच्याच सांख्यिकी विभागाने दिली आहे. एकटय़ा मुंबईत 6क् हजार कोटींहून अधिकची पायाभूत विकासकामे संथगतीने सुरू आहेत.
 
मुंबईतील रखडलेल्या कामांची व्याप्ती आहे मंत्रलयापासून नवी मुंबई विमानतळार्पयत.. दक्षिण टोकाला असणा:या मंत्रलयाच्या इमारतीला दोन वर्षापूर्वी आग लागली. त्यात पाचवा आणि सहावा मजला जळून खाक झाला. त्यानंतर सुरू झालेले दुरुस्तीचे काम अद्याप सुरूच आहे. नवीन सरकार सत्तेत येऊनही दुरुस्तीचे काम सुरूच असून, त्याचा खर्च मात्र 138 कोटींवरून 285 कोटींर्पयत पोहोचला. नवी मुंबई विमानतळाचीही हीच गत. 1998 साली 4क् दशलक्ष प्रवाशांचे ध्येय ठेवून साकारण्यात येणा:या विमानतळाचा खर्च 4 हजार 766 कोटी आखण्यात आला होता. विविध कारणांमुळे विमानतळ रखडतच राहिले. आता मात्र त्याच प्रकल्पाची किंमत 14 हजार 573 कोटींवर पोहोचली आहे. प्रकल्पाच्या किमतीत झालेली ही वाढ 3क्5} टक्क्याहून अधिक आहे. मुंबई महानगरातील सर्वच प्रकल्पांची अवस्था कमी-अधिक प्रमाणात अशीच आहे. मुंबई महापालिकेपासून एमएमआरडीए, अशा 17हून अधिक संस्था मुंबई महानगरात विकासकामात व्यस्त आहेत. या सर्व विकास प्राधिकरणांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे कुणाचा पायपोस कुणाला नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका साहजिकच विकासकामांना बसतो आहे. 1क् हजार कोटींचा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड, तितक्याच खर्चाचा कोस्टल रोड, सी-लिंक, जलवाहतूक अशा पर्यायांची निव्वळ घोषणा व चर्चाच पाहायला मिळते. गेल्या वर्षभरात काही प्रकल्प पूर्णत्वास आले; पण झालेल्या विलंबामुळे वाढलेल्या खर्चाचा आकडा चक्रावणारा आहे. 
 
- गौरीशंकर घाळे