शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पुढील वर्षापासून आरटीई प्रवेश बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:45 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाकडून खासगी इंग्रजी शाळांना सक्ती केली जाते. परंतु, त्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा देण्याबाबत शासनाकडून शाळांना ठेंगा दाखविला जात आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाकडून खासगी इंग्रजी शाळांना सक्ती केली जाते. परंतु, त्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा देण्याबाबत शासनाकडून शाळांना ठेंगा दाखविला जात आहे. राज्यभरातील शाळांना शुल्क परताव्यापोटी तब्बल ३४५ कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून आरटीई प्रवेश न देण्याचा पवित्रा इंग्रजी शाळांनी घेतला आहे.समाजातील आर्थिक व सामाजिक मागासवर्गीय घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या आरटीई कायद्याअंतर्गत २०१३-१४ पासून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येतात. त्यासाठी शासनाकडून काही शाळांना तीन वर्षे एका विद्यार्थ्यामागे साडेबारा हजार रुपयांपासून सतरा हजार सहाशे रुपयांपर्यंत रक्कम शुल्क परवावा म्हणून टप्प्याटप्प्याने देण्यात आली. पाच वर्षांत शिक्षण विभागाकडून एकूण केवळ १०४ कोटी रुपये शाळांना देण्यात आले आहेत. आरटीई प्रवेश न दिल्यास शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. परंतु, शुल्काची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते आहे.आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटी किती रक्कम शाळांना द्यावी याबाबतची मंजूरी शिक्षण विभागाला शासनाकडून घ्यावी लागते. २०१७-१८या शैक्षणिक वर्षात राज्यातील आरटीई प्रवेश क्षमतेच्या १ लाख २० हजार ८२२ जागांपैकी ६३ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.>शासनाकडून परतावा मिळत नसल्याने पालक-विद्यार्थ्यांसोबत डिसेंबरमध्ये मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल. तसेच पुढील वर्षापासून आरटीईचे प्रवेश थांबविले जाणार आहेत.- संजय तायडे पाटील,अध्यक्ष, मेस्टा>वेळेत शुल्क परतावा दिला जात नसल्याने संघटनेने शासनाला नोटीस बजावली आहे. तसेच पुढील वर्षापासून आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी न करण्याचाही निर्णय आम्ही घेतला आहे.- जागृती धर्माधिकारी, अध्यक्ष, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन