शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पुढील वर्षापासून आरटीई प्रवेश बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:45 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाकडून खासगी इंग्रजी शाळांना सक्ती केली जाते. परंतु, त्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा देण्याबाबत शासनाकडून शाळांना ठेंगा दाखविला जात आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के जागांवर गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनाकडून खासगी इंग्रजी शाळांना सक्ती केली जाते. परंतु, त्या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा देण्याबाबत शासनाकडून शाळांना ठेंगा दाखविला जात आहे. राज्यभरातील शाळांना शुल्क परताव्यापोटी तब्बल ३४५ कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून आरटीई प्रवेश न देण्याचा पवित्रा इंग्रजी शाळांनी घेतला आहे.समाजातील आर्थिक व सामाजिक मागासवर्गीय घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या आरटीई कायद्याअंतर्गत २०१३-१४ पासून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येतात. त्यासाठी शासनाकडून काही शाळांना तीन वर्षे एका विद्यार्थ्यामागे साडेबारा हजार रुपयांपासून सतरा हजार सहाशे रुपयांपर्यंत रक्कम शुल्क परवावा म्हणून टप्प्याटप्प्याने देण्यात आली. पाच वर्षांत शिक्षण विभागाकडून एकूण केवळ १०४ कोटी रुपये शाळांना देण्यात आले आहेत. आरटीई प्रवेश न दिल्यास शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. परंतु, शुल्काची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते आहे.आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटी किती रक्कम शाळांना द्यावी याबाबतची मंजूरी शिक्षण विभागाला शासनाकडून घ्यावी लागते. २०१७-१८या शैक्षणिक वर्षात राज्यातील आरटीई प्रवेश क्षमतेच्या १ लाख २० हजार ८२२ जागांपैकी ६३ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.>शासनाकडून परतावा मिळत नसल्याने पालक-विद्यार्थ्यांसोबत डिसेंबरमध्ये मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल. तसेच पुढील वर्षापासून आरटीईचे प्रवेश थांबविले जाणार आहेत.- संजय तायडे पाटील,अध्यक्ष, मेस्टा>वेळेत शुल्क परतावा दिला जात नसल्याने संघटनेने शासनाला नोटीस बजावली आहे. तसेच पुढील वर्षापासून आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी न करण्याचाही निर्णय आम्ही घेतला आहे.- जागृती धर्माधिकारी, अध्यक्ष, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन