शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

रेल्वेसाठी ३० हजार कोटींचा निधी उभारणार

By admin | Updated: May 15, 2016 04:50 IST

मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील रेल्वेच्या पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. परिणामी, रेल्वे मार्गांकडे दुर्लक्ष झाले आहे.

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील रेल्वेच्या पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. परिणामी, रेल्वे मार्गांकडे दुर्लक्ष झाले आहे. आता मात्र, अशी चूक होऊ देणार नाही, अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मुंबईतील रेल्वेच्या विकासासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या एकत्रित प्रयत्नातून ३० हजार कोटींचा निधी उभारण्यात येणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. कांजूर मार्ग आणि विद्याविहार स्थानकातील प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी सुरेश प्रभू बोलत होते. दादर येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी व्हिडीओद्वारे या प्रकल्पांचे लोकार्पण केले. सुरेश प्रभू यांनी या वेळी प्रवाशांना तत्काळ माहिती मिळेल, अशा सुविधेची घोषणा केली. आता रेल्वे का खोळंबली आहे, याची माहिती देणारे फलक फलाटांवर लावले जाणार आहेत. याच फलकावर रेल्वेसेवा कधी पूर्ववत होईल याचीही माहिती प्रवाशांना दिली जाणार आहे. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, चिडचिड कमी व्हावी आणि त्याचबरोबर स्टेशन मास्तरांची डोकेदुखी कमी व्हावी यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. याचबरोबर रेल्वे प्रशासन करत असलेल्या विकासकामांच्या फलकांचाही यात समावेश असणार आहे, असे प्रभू यांनी सांगितले.वर्षानुवर्षे स्टेशन मास्तरांच्या पांढऱ्या युनिफॉर्मचा रंग आता बदलणार आहे. त्यामुळे यापुढे स्टेशन मास्तर वेगळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फॅशन डिझायनर रितू बेरी यांच्याशी युनिफॉर्मविषयी चर्चा सुरू असल्याचेही प्रभू यांनी स्पष्ट केले. युनिफॉर्ममध्ये तर बदल होणार आहेतच त्याचबरोबरीने त्यांच्या अधिकारांतही वाढ करण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही प्रभू यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)