शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

राज्यभरातील २०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: July 5, 2016 04:08 IST

राज्य शासनाच्या धोरणांच्या विरोधात ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजारांमधील कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात आले. व्यापारी व कामगारांच्या आंदोलनामुळे राज्यभर २०० कोटी रुपयांचे व्यवहार

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

राज्य शासनाच्या धोरणांच्या विरोधात ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजारांमधील कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात आले. व्यापारी व कामगारांच्या आंदोलनामुळे राज्यभर २०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांवर निर्बंध आणणे व बाहेरील व्यापार नियंत्रणमुक्त करणे याला विरोध दर्शविण्यात आला. गुजरातच्या धर्तीवर पूर्ण व्यापारच नियंत्रणमुक्त करण्याची मागणी व्यापारी आणि कामगारांनी केली आहे. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा व ग्राहकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने भाजीपाला व फळांवरील बाजारसमितीचे नियंत्रण उठवले आहे. शेतकऱ्यांचे हित होत असेल तर या निर्णयाला पाठिंबा आहे. परंतु बाजार समितीमधील व्यापारी व कामगारांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. माथाडी व व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले की, राज्यातील ३०५ बाजारसमित्या व ६०३ उपबाजारांमध्ये वर्षाला ६२ हजार कोटींची उलाढाल होते. मुंबईमध्येच एक ते दीड हजार कोटींची उलाढाल होते. शासनाने २०१४ मध्ये साखर, डाळ, रवा, मैदा, सुका मेवा, तेल या वस्तू नियंत्रणमुक्त केल्या आहेत. त्याच धर्तीवर आता फळे व भाजीपाला नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय घेतला.निषेध सभा : वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची निषेध सभा झाली. नाशिक, यवतमाळ, धुळे, जळगाव, सोलापूर आदी जिल्ह्यांमधील व्यापारी, कामगार त्यात सहभागी झाले. शासन शेतकऱ्यांच्या हिताचे नाव घेवून भांडवलदारांसाठी पायघड्या घालत आहे. त्यांचे शेतकरी प्रेम बेगडी आहे. आमचा त्यांच्या धोरणाला विरोध नाही. फक्त आमचे म्हणणे ऐकून घ्यावे व सर्वांसाठी समान नियम असावे, या मागणीसाठी राज्यव्यापी बंद करण्यात आला.- आ. शशिकांत शिंदे, माथाडी नेतेएपीएमसीतील व्यापाऱ्यांना नियंत्रण व बाहेर व्यापार करणाऱ्यांना स्वातंत्र्य ही दुहेरी नीती योग्य नाही. गुजरात सरकारने १६ एप्रिल २०१५ मध्ये अध्यादेश काढून भाजीपाला नियंत्रणमुक्त केला आहे. त्या धर्तीवर संपूर्ण नियंत्रणमुक्ती करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. - संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी -मुंबई एपीएमसी