शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्काराच्या रकमेत १५ लाखांची भर घालत बाबासाहेबांची कर्करोगग्रस्तांना २५ लाखांची मदत

By admin | Updated: August 19, 2015 19:31 IST

ज्या ज्या लोकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून इतिहास ललित स्वरुपात लोकांपर्यंत पोचवला ते सगळे जण महाराष्ट्र भूषण असल्याचे महाराष्ट्र भूषण पुरंदरे म्हणाले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - महाराष्ट्र भूषण पुरस्काराने माझ्यावर जबाबदारी वाढल्याचं सांगणा-या बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरस्काराच्या १० लाखांच्या रकमेत १५ लाखांची भर टाकत कर्करोग ग्रस्तांसाठी २५ लाख रुपयांची देणगी देण्याचे पुरस्कार स्वीकारताना जाहीर केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज संध्याकाळी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात  प्रदान करण्यात आला. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. राजभवनातील दरबार सोहळ्यात संपन्न झालेल्या या सोहळ्याला निवडक २५० लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बाबासाहेव पुरंदरेंनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ज्या - ज्या लोकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून इतिहास ललित स्वरुपात लोकांपर्यंत पोचवला ते सगळे जण महाराष्ट्र भूषण आहेत. 
 
बाबासाहेबांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
- इतिहास हे मौलिक धन आहे. तिचा आदर व्हायला, अपमान होता कामा नये. इतिहास सांगण्यासाठी कलाकार हवेत, नाटककार हवेत, कवी आहेत...
- आता तेलाच्या दिव्यातलं तेल संपलंय फक्त वात जळतंय अस सांगत आपल्या ९४ या वयाचा उल्लेख बाबासाहेब पुरंदरेंनी भावनात्मक होत केला.
- कलाकारांनी कधीही अहंकार मनी धरू नये. अहंकाररहीत जे कार्य करतात तेच खरे.
- हा पुरस्कार देऊन मला प्रचंड मोठी जबाबदारी दिली आहेत. हा मला पेलेल का अशी माजी भावना आहे. मी गरीब आहे, साधा आहे.
- इतिहास ललित लेखनातून मांडतानाही प्रचंड अभ्यास केला पाहिजे, कुठलीही चूक होता कामा नये. त्यातून काही चूक झाली तर दुरूस्त करायची तयारी हवी आणि मी व्रत म्हणून हे स्वीकारलं.
- टिळकांचा गीतारहस्य ग्रंथ किती जणांनी वाचलाय पण लोकांना कळणारी गीताई जास्त वाचली गेलीय. टिळकांचं कार्य थोरच पण विनोबांची गीताई घराघरात पोचली. म्हणून मीपण सोप्या भाषेत व या शैलीत शिवचरीत्र लिहिलं .
- शिवाजी महाराजांच्या कालखंडातली पाच लाख कागदपत्रे राजस्थानमध्ये बिकानेर येथील संग्रहालयात आहे. कुणीतरी अभ्यास करायला हवा. म्हणून इतिहास संशोधक महामंडळाच्या माध्यमातून एक खंड लिहिला. 
- लोकांना ही शैली आवडली, त्यांनी माझं शिवचरीत्र, लेखन स्वीकारलं.
- ज्ञानेश्वरीच मार्ग सापडला. भगवत गीतेचे तत्वज्ञान सगळ्यांपर्यंत पोचवायचं असेल तर सोप्या मराठीत ज्ञानोबांनी पोचवलं. आणि मला मार्ग सापडला. लोकांपर्यंत पोचावं म्हणून अशा शैलीत मी शिवचरीत्र लिहिलं.
-  महाराष्ट्रात विविध ठिकाणी गेलो. ९ भाषा येणारा व २५ पुस्तकं लिहिणारा ग. ह. खरेंसारखा श्रेष्ठ गुरू लाभला. लोकांना समजणार नसेल, पोचणार नसेल, खेड्यापाड्यात जाणार नसेल तर काय उपयोग.. म्हणून सहा महिने मी विचार करत होतो.
- सुरुवातीच्या काळात मी नऊ लेख लिहिले आणि एका  मासिकात छापायला दिले. त्यानंतर ते छापूनही आले, मात्र ती त्या छापून आलेल्या लेखांविषयी कोणी अभिप्राय पाठवितो काय, याची वाट पाहत होतो, पण एकही प्रतिसाद आला नाही. त्यावेळी मी खूप बेचैन झालो होतो.  
- चर्चा, चिकित्सा, भाष्य, मूल्यमापन या सगळ्या गोष्टी मी इतिहासाच्या बाबतीत केल्या. ते सगळे नऊ लेख एका अंकात छापून आले. पण एकही प्रतिसाद आला नाही.
--------------------------------
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा कोणाची भीती वाटल्यामुळे राजभवनात आयोजित केला नाही. छत्रपतींच्या खऱ्या सेवकांना कोणाची भीती वाटणे शक्य नाही. देशातील महत्त्वपूर्ण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण हा राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते राजभवनात प्रदान करावा म्हणूम आम्ही हा पुरस्कार सोहळा राजभवनात आयोजित केला आहे. वाद करणा-या लोकांना छत्रपती समजलेच नाहीत, त्यांच्या नावाने जातिभेद ते करतात. आज छत्रपती असते तर त्यांनी या वाद घालणा-यांचा कडेलोट केला असता.  बाबासाहेबांनी मुलामुलांध्ये राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण केले. शाळेतली मुलं जाणता राजा बघतात, त्यावेळी वेगळी राष्ट्रभक्ती शिकवण्याची गरज राहत नाही.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस 
--------------------------------------
मलाही शिवाजी महाराजांबद्दलची बरीच माहिती बाबासाहेबांच्या व्याख्यानातून आणि पुस्तकातूनच मिळाली. मात्र, आता त्यांच्याबद्दल ज्याप्रकारचे आक्षेप घेतले जात आहेत, ते अर्धा टक्काही खरे नाहीत हे शिवचरित्र वाचल्यावर कळेल. तावडेंसारखा मराठा फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी पुरंदरेंना पुरस्कार देतो असं कोण का पसरवतंय हा शोधाचा विषय आहे... हे कोण का करतंय हेच कळत नाही. मी मराठा आहे म्हणून पुरंदरेंवर प्रेम करायचं नाही का? छत्रपती शिवरायांच्या प्रेमापोटीच आम्ही अनेक निर्णय घेत आहोत आणि जनता सजग आहे. बाबासाहेबांना हा पुरस्कार माझ्या अध्यक्षतेखालील समितीने दिला ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयानेही बाबासाहेबांच्या ५० वर्षांच्या कार्याला पोचपावती दिली आहे.
- सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे