शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

कांदा भावात 100 रु पयाची घसरण ; शेतकरी चिंतेत...

By admin | Updated: May 18, 2016 20:16 IST

कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली स्थिर असून बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रती क्विंटल झाले सरासरी 600 रु पये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे

ऑनलाइन लोकमतयेवला, दि. १८ - येवला बाजार समितीत कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली स्थिर असून बुधवारी कांद्याचे बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रती क्विंटल झाले सरासरी 600 रु पये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहे. कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे आज ३०० ते ९१२ रूपये प्रतिक्विंटल राहिले.गेल्या दीड महिन्यापासून घसरलेला कांदा बाजारभाव कांद्याचे उत्पादन अधिक वाढल्याने बुधवारी आणखी १०० रु पयांनी घसरले.तालुक्यात पाणी नाही परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी ठोका पद्धतीने अन्य तालुक्यात कांदा लागवडीसाठी गेलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.आता खर्च तर करून बसलो परंतु भाव घसरत असल्याने हाती धुपटणे घेण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याचे भाव घसरत असताना आता शेतकरी शासनाला जाब विचारू लागला आहे. कृषीमूल्य आयोगाची भाव ठरवण्याची पध्दती कांद्याच्या बाबत का मुग गिळून बसते असा सवाल विजय कदम यांनी उपस्थित केला.शेतकऱ्याचा कांदा वाढला की, हाकाटी पिटली जाते पण तोच कांदा उत्पादन खर्च फिटत नसतांना शेतकर्यांना विकावा लागतो या बाबत मात्र केंद्रशासन काहीच बोलत नाही. हि वस्तुस्थिती आहे. अच्छे दिन येण्यासाठी उचललेले पाऊल चुकले कि काय ? अशी प्रतिक्र ीया शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे यांनी दिली.---------येवला तालुक्यात पाणीच नाही भयावह दुष्काळ आहे. पोट भरण्यासाठी व मुलीबाळी लग्नाला आल्या त्यांची शिरावर अक्षदा टाकण्याच्या काळजीत दुसर्या तालुक्यात जावून कष्टाने कांदा पिकवला आहे. पण कमालीचे भाव घसरल्याने आम्ही धास्तावलो आहे. किमान १५०० रु पये प्रतीक्विंटल बाजारभाव मिळाला तरच परवडणार आहे.अन्यथा सध्याच्या परिस्थितीत कांदा हा आतभट्टीचा व्यवसाय ठरत आहे.-अशोक खोकले,शेतकरी आडगावचोथवा