शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीडित कुटुंबाला १ कोटीची भरपाई

By admin | Updated: June 11, 2017 01:30 IST

सुमारे ११ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या सुदाम औटी या पुण्यातील व्यक्तीच्या कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एक कोटी रुपयांहून अधिक भरपाई मिळणार आहे.

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुमारे ११ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या सुदाम औटी या पुण्यातील व्यक्तीच्या कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एक कोटी रुपयांहून अधिक भरपाई मिळणार आहे.ज्या टेम्पोने समोरून धडक दिल्याने सुदाम यांचा २५ मे २००६ रोजी जागीच मृत्यू झाला त्या टेम्पोचा मालक आणि त्या वाहनाचा विमा उतरविलेली न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी यांनी मिळून औटी कुटुंबास ७८ लाख ११ हजार ५३३ रुपये भरपाईपोटी द्यावेत, असा आदेश न्या. एम. एस. सोनक यांनी दिला. या रकमेवर भरपाईचा दावा दाखल केला तेव्हापासूनचे सात टक्के दराने व्याजही मिळणार असल्याने एकूण भरपाई सव्वा कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.अपघात झाला तेव्हा सुदाम ४६ वर्षांचे होते व ते रिलायन्स इंडस्ट्रिजच्या पातळगंगा कारखान्यात मॅनेजर म्हणून नोकरीस होते. मारुती अल्टो मोटारीने काही जणांसोबत अहमदनगर-कल्याण रस्त्यावरून ओझरच्या दिशेने जात असता समोरून येणाऱ्या टेम्पोने अल्टोला जोरदार धडक दिल्याने सुदाम यांचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नी, मुले व आईने केलेला भरपाईचा दावा मंजूर करून पुण्याच्या मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने एप्रिल २०११ मध्ये ७१ लाख ३६ हजार ९१७ रुपयांची भरपाई सात टक्के व्याजासह मंजूर केली होती. त्याविरुद्ध विमा कंपनी अपिलात आली होती.भरपाईची रक्कम निम्मी म्हणजे ३५ लाख रुपये करावी, अशी विमा कंपनीची मागणी होती. न्या. सोनक यांनी दोन्ही बाजूंचा विचार केला आणि अपघात होण्यात स्वत: सुदाम यांच्या निष्काळजीपणाचा काहीच भाग नव्हता या निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले. सोबतच न्याायधिकरणाने केलेला हिशेब चुकला असल्याने न्या. सोनक यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेमधील विशेषाधिकाराचा वापर करून पुन्हा हिशेब केला आणि भरपाई वाढवून दिली आहे. त्यामुळे कंपनीला जास्त रक्कम द्यावी लागेल.- औटी कुटुंबाच्या वतीने असे दाखवून देण्यात आले की, सुदाम मोबाइलवर बोलत गाडी चालवीत होते याला कोणताही पुरावा नाही, कारण अपघातस्थळाच्या पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात मोबाइल मिळालेला नाही. मोबाइलबाबत कुणालाच माहिती नाही.