13 जागांची मागणी असताना केवळ 3 जागा देण्याची तयारी
मुंबई : रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शिवसेना-भाजपाकडे 13 ते 15 जागांची मागणी केली असताना या दोन्ही पक्षांनी जेमतेम तीन ते चार जागा देण्याची तयारी दाखवल्याने रिपाइंचे नेते नाराज झाले असून 1क् सप्टेंबर्पयत सामाजिक संवेदनशीलता दाखवून सन्माननीय वाटा दिला नाही, तर महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
रिपाइंचे प्रवक्ते अजरुन डांगळे पत्रकार परिषदेत म्हणाले की, आम्ही प्रारंभी केलेली जागांची मागणी कमी करीत आता 13 ते 15 जागांवर तडजोड करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र शिवसेना-भाजपा या पक्षांनी आमची केवळ दोन-चार जागांवर बोळवण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. रिपाइंची प्रत्येक मतदारसंघात पाच ते 25 हजार मते असून ही मते लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळाल्यानेच त्यांच्या उमेदवारांना मताधिक्क्य प्राप्त झाले, असा दावा डांगळे यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिसणारा जिव्हाळा वाटाघाटी करणा :या नेत्यांमध्ये दिसत नाही. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारण्याकरिता आम्ही महायुतीसोबत आलो आहोत. परंतु अशी ससेहोलपट होणार असेल तर 1क् सप्टेंबर रोजी होणा:या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा डांगळे यांनी दिला.
तावडे-महातेकर यांच्यात 8 जागांवर चर्चा
भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे व रिपाइंचे नेते सुमंत गायकवाड व अविनाश महातेकर यांच्यात भाजपाच्या कोटय़ातील आठ जागांबाबत बुधवारी चर्चा झाली. त्यामध्ये चेंबूर, कुलाबा, पिंपरी, केज, गंगाखेड, चाळीसगाव, उत्तर नागपूर, बाळापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत होणा:या कोअर कमिटीच्या बैठकीत गुरुवारी चर्चा होईल व त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी पुन्हा रिपाइंच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे.