शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

बॉक्साईट वाहतुकीत नियमांना हरताळ

By admin | Updated: April 29, 2016 03:49 IST

तालुक्यातील खाणीतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे.

श्रीकांत शेलार,

श्रीवर्धन- तालुक्यातील खाणीतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे. या प्रकारात उत्खननासाठी परवाना घेण्यापासून ते कारखान्यात पोचवण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट विपुल प्रमाणात आहे. शेखाडी, खुजारे, कुडगाव, कुरवडे-मारल तसेच सायगाव, मेघरे येथे प्रामुख्याने बॉक्साईटचे साठे आहेत. गेली बारा वर्षे येथे आशापुरा माईनसाठी अल्टगेज स्टोन क्र शर ही कंपनी खाणकाम करत आहे. साधारण २१०० एकरांतील खाणक्षेत्रात पाच कोटी टन साठा असल्याचा अंदाज आहे. वर्षाला एका खाणीतून एक ते तीन लाख टन उत्खनन होत असून कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते. मात्र हे उत्खनन होत असताना नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. खाणीतून उत्खनन करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने नियम ठरवून दिले आहेत. परवानगी मिळेपर्यंत हे नियम कागदावर असतात. एकदा का परवाना मिळाला, की हवे तसे उत्खनन केले जाते. राज्यात सर्वच खाणींची ही अवस्था आहे. खाणीचे उत्खनन करताना किंवा त्यातून बॉक्साईट काढताना खनिकर्म विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार एक विशिष्ट चौकोनी खड्डा करून त्यातील उत्खनन आधी करावे, त्यानंतर तो खड्डा बुजवून अन्य चौकोनात बॉक्साईडचे उत्खनन होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्ष खाणींची स्थिती पाहिली तर सर्रास उत्खनन करून मोठे खड्डे करून ते कधीही भरले जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय उत्खनन नेमके किती झाले, याची मोजदाद करणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याचा फायदा खाणमालक घेत आहेत. खाणीतून बाहेर पडणारे बॉक्साईट तपासण्यासाठीची जबाबदारी जिल्हा पातळीवरील खनिकर्म विभागाची असते. परंतु या विभागाचे अधिकारी देखरेख करण्यासाठी फिरकतही नाहीत. बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर अचानक धाड पडल्यास खरी परिस्थिती उघड होऊ शकते. बॉक्साईटच्या बेसुमार वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत आहे. वृक्षांचीही हानी होत आहे. शिवाय अनेक ठिकाणी अपघात होऊन निरपराधांचे बळी जात आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील हरेश्वर ते आराठी तसेच आराठी ते दिघीपर्यंत या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. बॉक्साईटच्या खाणींवर स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून केवळ कागदोपत्री लक्ष ठेवले जात आहे. मात्र प्रत्यक्षातील स्थिती भयानक असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. >खाणकामावर नियंत्रणच नाहीखाणीतील बॉक्साईटचे उत्खनन कोट्यवधींच्या घरातील आहे. विपुल नैसर्गिक संपदा असलेल्या या भागात बेछूटपणे आणि बेकायदा खाणकामाविरोधात पर्यावरणवादी संघटनांनी व परिसरातील जागरूक नागरिकांनी सातत्याने आवाज उठविला आहे. तथापि नियमबाह्य खाणकामास लगाम घालण्यात शासकीय यंत्रणेला अपयश येत आहे. कायद्याने घालून दिलेली बंधने पाळली तरच येथील नैसर्गिक अस्तित्व टिकेल, खाणींना परवाना देताना खाणकामाच्या जागेत वृक्षारोपण व त्यांचे संगोपनाचे बंधन घालणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.