शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्साईट वाहतुकीत नियमांना हरताळ

By admin | Updated: April 29, 2016 03:49 IST

तालुक्यातील खाणीतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे.

श्रीकांत शेलार,

श्रीवर्धन- तालुक्यातील खाणीतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे. या प्रकारात उत्खननासाठी परवाना घेण्यापासून ते कारखान्यात पोचवण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट विपुल प्रमाणात आहे. शेखाडी, खुजारे, कुडगाव, कुरवडे-मारल तसेच सायगाव, मेघरे येथे प्रामुख्याने बॉक्साईटचे साठे आहेत. गेली बारा वर्षे येथे आशापुरा माईनसाठी अल्टगेज स्टोन क्र शर ही कंपनी खाणकाम करत आहे. साधारण २१०० एकरांतील खाणक्षेत्रात पाच कोटी टन साठा असल्याचा अंदाज आहे. वर्षाला एका खाणीतून एक ते तीन लाख टन उत्खनन होत असून कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते. मात्र हे उत्खनन होत असताना नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. खाणीतून उत्खनन करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने नियम ठरवून दिले आहेत. परवानगी मिळेपर्यंत हे नियम कागदावर असतात. एकदा का परवाना मिळाला, की हवे तसे उत्खनन केले जाते. राज्यात सर्वच खाणींची ही अवस्था आहे. खाणीचे उत्खनन करताना किंवा त्यातून बॉक्साईट काढताना खनिकर्म विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार एक विशिष्ट चौकोनी खड्डा करून त्यातील उत्खनन आधी करावे, त्यानंतर तो खड्डा बुजवून अन्य चौकोनात बॉक्साईडचे उत्खनन होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्ष खाणींची स्थिती पाहिली तर सर्रास उत्खनन करून मोठे खड्डे करून ते कधीही भरले जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय उत्खनन नेमके किती झाले, याची मोजदाद करणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याचा फायदा खाणमालक घेत आहेत. खाणीतून बाहेर पडणारे बॉक्साईट तपासण्यासाठीची जबाबदारी जिल्हा पातळीवरील खनिकर्म विभागाची असते. परंतु या विभागाचे अधिकारी देखरेख करण्यासाठी फिरकतही नाहीत. बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर अचानक धाड पडल्यास खरी परिस्थिती उघड होऊ शकते. बॉक्साईटच्या बेसुमार वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत आहे. वृक्षांचीही हानी होत आहे. शिवाय अनेक ठिकाणी अपघात होऊन निरपराधांचे बळी जात आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील हरेश्वर ते आराठी तसेच आराठी ते दिघीपर्यंत या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. बॉक्साईटच्या खाणींवर स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून केवळ कागदोपत्री लक्ष ठेवले जात आहे. मात्र प्रत्यक्षातील स्थिती भयानक असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. >खाणकामावर नियंत्रणच नाहीखाणीतील बॉक्साईटचे उत्खनन कोट्यवधींच्या घरातील आहे. विपुल नैसर्गिक संपदा असलेल्या या भागात बेछूटपणे आणि बेकायदा खाणकामाविरोधात पर्यावरणवादी संघटनांनी व परिसरातील जागरूक नागरिकांनी सातत्याने आवाज उठविला आहे. तथापि नियमबाह्य खाणकामास लगाम घालण्यात शासकीय यंत्रणेला अपयश येत आहे. कायद्याने घालून दिलेली बंधने पाळली तरच येथील नैसर्गिक अस्तित्व टिकेल, खाणींना परवाना देताना खाणकामाच्या जागेत वृक्षारोपण व त्यांचे संगोपनाचे बंधन घालणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.