शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

विनयभंग करणाऱ्या ठाण्यातील चौघांना ‘रस्तेसफाई’ची शिक्षा

By admin | Updated: January 8, 2016 03:50 IST

मद्यधुंद अवस्थेत एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या ठाण्याच्या चार तरुणांना उच्च न्यायालयाने हटके निकाल देत चांगलाच धडा शिकवला

मुंबई : मद्यधुंद अवस्थेत एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या ठाण्याच्या चार तरुणांना उच्च न्यायालयाने हटके निकाल देत चांगलाच धडा शिकवला. पुढील सहा महिने प्रत्येक रविवारी तब्बल आठ तास सार्वजनिक रस्ता साफ करण्याची शिक्षा न्यायालयाने या चौघांना ठोठावली.ठाण्यातील पाचपाखाडीचे चार तरुण अंकित जाधव, सुहास ठाकूर, मिलिंद मोरे आणि अमीत अडखळे यांच्यावर गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात ठाणे पोलिसांनी विनयभंग आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी या चौघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठासमोर होती. तक्रारदाराबरोबर सामंजस्याने हा वाद सोडवण्यात आल्याचे म्हणत या चौघांनीही हे आरोप रद्द करण्यात यावे, असे याचिकेत म्हटले. या चौघांनाही असेच सोडता कामा नये. त्यांच्यावरील एफआयआर जरी रद्द केला तरी त्यांना त्याऐवजी काहीतरी सामाजिक सेवा करावीच लागेल, असे म्हणत खंडपीठाने पुढील सहा महिने दर रविवारी या चौघांनाही तब्बल आठ तास सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई करण्याचे आदेश दिले. हे चौघेही ही समाजसेवा करतात की नाही, यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याला लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)दसरा मिरवणुकीत सहभागी असलेल्या महिलेचा या चौघांनीही विनयभंग केला. यांना अडवणाऱ्या माणसाला चौघांनी मारहाण केली. घटनेच्या वेळी हे चौघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे या चौघांवरही विनयभंग आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.