शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

रोशनीचे कुटुंबीय रेशनकार्डापासून २० वर्षे आहे वंचित

By admin | Updated: September 20, 2016 03:45 IST

तालुक्यातील पेठ रांजणी या गावात कुपोषणाने दगावलेली रोशनी सवर (२) हिचा बळी सरकारी अनास्थेमुळेच झाला

वसंत भोईर,

वाडा- तालुक्यातील पेठ रांजणी या गावात कुपोषणाने दगावलेली रोशनी सवर (२) हिचा बळी सरकारी अनास्थेमुळेच झाला असून तीच्या मृत्यूचे वृत्त गुरूवार दि.१५ लोकमतमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर लगेचच आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या कुटुंबाला भेटले परंतु त्याला कोणतीही मदत न करता परतल्याने या कुटुंबाला आजही मृत्यूशी झुंज देतच जगावे लागते आहे. गुरूनाथ सवर यांचे अत्यंत दारीद्रयाने पिचलेले कुटुंब असून सरकारी योजना त्यांच्यापासून कोसोमैल दूर आहेत. गेल्या २० वर्षापासून या कुटुंबाला साधे रेशनकार्ड नाही. त्यामुळे त्यांना रेशनचे धान्य मिळत नाही. रेशनकार्ड मिळावे म्हणून त्यांच्या वडिलांनी दोन वेळा तहसिल कार्यालयाकडे अर्ज करून अनेक हेलपाटे मारले होते. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळै त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. तेव्हा पासून हे कुटुंब रेशिनिंग पासून वंचित आहे. आता रेशनकार्ड मिळावे म्हणून पुन्हा अर्ज विनंत्या करणार असल्याचे सवर यांनी सांगितले.त्याच प्रमाणे रोजगार नसल्याने वारंवार या कुटुंबाला रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. कारण शासनाची गावातच रोजगार देण्याची रोजगार हमी योजनाही निटपणे येथे कार्यान्वीत होवू शकलेली नाही. तसेच आजही हे कुटुंब एका साध्या झोपडीत राहत असून घरकुल योजनेचाही लाभ या कुटुंबाला मिळालेला नाही. पोषण आहार योजनाही कागदावरच आहे.रोशनीचे वडील गुरूनाथ सवर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आम्ही दारीद्रयाशी झगडतो आहोत त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत करत आहोत. परंतु आमच्या प्रयत्नांना शासनाची साथ मिळत नाही. अजूनही मला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याने मी झोपडीतच राहतो. गेल्या २० वर्षापासून रेशनकार्ड नसल्याने रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागते. त्यामुळे माझे दारीद्रय कायम असल्याची खंत सवर यांनी व्यक्त केली. मंत्री महोदय येणार असल्याने आमच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, काहीच आश्वासन न दिल्याने आमचा भ्रमनिरास झाला असल्याची प्रतिक्रिया सवर यांनी दिली.>निधीअभावी अमृत आहार योजना कागदावरच गतवर्षी आदिवासी विकास विभागाने मोठा गाजावाजा करून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची घोषणा केली होती परंतु निधीच अजून पर्यंत उपलब्ध झाला नसल्याने ही योजना कागदावरच दिसत आहे. रोशनची आई ममता सवर ही आठ महिन्याची गरोदर असतांना तिला सहाव्या महिन्यापासून अमृत आहार योजना सुरू व्हायला हवी होती. मात्र निधी अभावी तीला पोषण आहार मिळू शकला नाही. आता रोशनीच्या मृत्यू नंतर जाग आलेल्या प्रशासनाने तातडीने तीला आता पोषण आहार सुरू केला आहे.पिडीत कुटुंबीयांच्या घरी भेटीला गेलेल्या सवरांनी पोषण आहार सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याच वेळी अंगणवाडी सेविकांना योजनेचा निधीच मिळत नसल्याने उसनवारी करून ही योजना राबवावी लागत असल्याचे यावेळी उघड झाले. त्यामुळे आदिवासी विकास विभागाची ही योजना निधी अभावी कागदावरच सुरू असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात वाडा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता रोशनी कुपोषित होती. तिला श्वसनाचा त्रास होत होता त्यामुळे तीला उपचारासाठी दाखल केले होते. त्रास वाढल्याने तीला ठाणे येथे उपचारासाठी पाठवले असता वाटेतच तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.