शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

शेपटीसारख्या रांगा कायमच

By admin | Updated: November 19, 2016 03:49 IST

चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून सामान्यांची परवड सुरू आहे.

कल्याण : चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून सामान्यांची परवड सुरू आहे. या निर्णयाला ११ दिवस उलटले तरी सामान्यांना अजून दिलासा मिळालेला नाही. राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या बाहेर आजही पैसे काढणे आणि भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा कायम आहेत. पैसे काढण्यावरील मर्यादा कमी केल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. त्यात, भर म्हणजे बहुतांश बँकांची एटीएम मशीन बंद आहेत. ग्राहकांच्या हातीच पैसा नसल्याने बाजारात सगळीकडे मरगळ आहे. शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांची एटीएम तसेच कॅश स्वीकारणारी मशीनही बंद आहेत. त्यामुळे पैसे काढणे व भरण्यासाठी स्वतंत्र मोठ्या रांगा लागत आहेत. बँकेच्या बाहेर उभारलेल्या मंडपांमुळे रांगेतील नागरिकांना दिलासा मिळत आहे. बँकेतील सगळीच काउंटर सुरू नसल्याने त्यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एटीएम मशीनमधील कॅश संपल्याने एटीएम मशीन बंद असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले. मशीनमध्ये दुपारी ३ वाजता कॅश भरली जाईल. त्यानंतर, नागरिकांना पैसे मिळतील, अशी माहिती त्याने दिली. शिवाजी चौकातील एका सहकारी बँकेचे एटीएममशीन बंद आहे. बँकेत पासबुकएण्ट्री केली जात नाही. बँकेने प्रवेशद्वारावरच एक नोटीस लावली आहे. त्यात खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा साडेचार हजारांऐवजी दोन हजार रुपये केल्याचे म्हटले आहे. या बँकेत दोन हजारांची नोट उपलब्ध होती. त्यामुळे ही नोट घेऊन बाजारात गेल्यास कोणीही सुटे देत नसल्याने त्याचा उपयोग काय, असा सवाल नागरिक करत आहेत. हॉटेलचालक रेहान शेख यांनी सांगितले की, हॉटेलचा धंदा पार बसला आहे. जेवण व नाश्त्यासाठी येणारे ग्राहक सुटे पैसे नसल्याने परत जात आहेत. सुटे नसल्याने आमचाही नाइलाज होत आहे. (प्रतिनिधी)>भाजीपाल्याचे केवळ ११० ट्रक : कल्याण बाजार समितीत पूर्वी भाजीपाल्याचे १४० ट्रक येत असत. आता नोटाबंदीमुळे मालाची आवक घटली आहे. शुक्रवारी मालाच्या ११० गाड्या आल्या होत्या. सुटे पैसे नसल्याने त्याचा फटका व्यवहाराला बसत आहे. २५ टक्के व्यवहारात घट झाली आहे. उधारी किती दिवस चालवणार. रोखीचा व्यवहारच कमी झाला आहे. पैसा आला नाही तर बाजार ठप्प होऊ शकतो, अशी भीती समितीचे सभापती अरुण पाटील यांनी व्यक्त केली. >कामगारांना पगार द्यायचा कसा? : कंत्राटदार उल्हास जामदार यांनी सांगितले की, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा आणखी कमी केल्याने दोन हजारांची नोट बँकेतून मिळते आहे. परंतु, या रकमेचे सुटे पैसे बाजारात मिळत नाहीत. त्यामुळे ही नोट काही कामाची नाही. बँक १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा देत नाही. या नोटा दिल्या तरच बाजारातील चलनकोंडी फुटू शकते. कामगारांना पगार कसा द्यायचा, अशी अडचण आमच्यासमोर आहे. >शाई लावून घेण्यास ‘त्यांचा’ नकारपोस्ट आॅफिसमधून पैसे काढण्यासाठी शुक्रवारी काही मुस्लिम महिला रांगेत उभ्या होत्या. बोटाला शाई लावून घेण्यास त्यांनी नकार दिला. नमाज पठण करताना अडचण येते, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.