शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
4
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
5
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
6
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
7
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
8
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
9
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
10
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
11
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
12
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
13
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
14
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
15
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
16
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
17
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
19
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
20
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग

छत हरपल्याने मंदिराचा आसरा

By admin | Updated: March 2, 2017 02:53 IST

अनधिकृत इमारतींवरील कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांपुढे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले

सूर्यकांत वाघमारे,नवी मुंबई- अनधिकृत इमारतींवरील कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांपुढे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन परीक्षेच्या काळात त्यांच्यावर हे संकट कोसळले असून त्यामधील बहुतेक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेले घरच राहिले नसल्यामुळे अखेर परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार दिघा येथील अनधिकृत इमारतींवर एमआयडीसीने कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी नियोजित चारपैकी दोन इमारतींवर एमआयडीसीतर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई काही दिवसांकरिता पुढे ढकलावी अशी तिथल्या रहिवाशांची मागणी होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाला बगल न देताच एमआयडीसीने दोन इमारतींवर कारवाई केली. भूमाफियांनी स्वत:च्या फायद्यासाठी उभारलेल्या या इमारतींमधील घरे विकून त्यांची फसवणूक केलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात भरडला गेलेला आहे तो फक्त सामान्य घर खरेदीदार. या कारवाईमुळे त्याठिकाणची अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. याचा सर्वाधिक मनस्ताप विद्यार्थ्यांना झाला असून अनेक जण दहावी, बारावीचे विद्यार्थी आहेत. ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात बेघर झाल्यामुळे परीक्षा द्यायची की नाही? द्यायची तर कशी? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. त्यावर उपाय म्हणून काही कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांकरिता मंदिरात ठाण मांडले आहे.कौटुंबिक परिस्थितीत सुधार घडवण्यासाठी शिक्षण हाच पर्याय असल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाचीही तयारी करत आहेत. तर मुलांना परीक्षेचा अभ्यास करता यावा व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशी पालकांची धारणा आहे. यामुळे त्यांनाही नाइलाजास्तव उघड्यावर संसार मांडावा लागला आहे. दुसरीकडे राहायला जायचे तर आर्थिक भार सोसणार कसा? जरी नातेवाइकांकडे आधार मिळाला तर विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होईल अशीही चिंता त्यांना सतावत आहे. या सर्व संकटांवर मात करून परीक्षा देण्याची जिद्द अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. याच जिद्दीने दिवस-रात्र एक करून मंदिराच्या आवारात ते अभ्यासासाठी जमत आहेत. त्यापैकीची निशा गुप्ता या बारावीच्या विद्यार्थिनीने स्वत:च्या भवितव्याची चिंता व्यक्त केली आहे. परीक्षेत उत्तम गुणांनी पास होण्याची तयारी सुरू असतानाच आपल्यावर बेघर होण्याची वेळ आल्याची नाराजी तिने व्यक्त केली. परंतु या संकटाला खचून न जाता मंदिरात बसून अभ्यास करून परीक्षा देत असल्याचेही तिने सांगितले. (प्रतिनिधी)