शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

छत हरपल्याने मंदिराचा आसरा

By admin | Updated: March 2, 2017 02:53 IST

अनधिकृत इमारतींवरील कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांपुढे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले

सूर्यकांत वाघमारे,नवी मुंबई- अनधिकृत इमारतींवरील कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांपुढे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन परीक्षेच्या काळात त्यांच्यावर हे संकट कोसळले असून त्यामधील बहुतेक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेले घरच राहिले नसल्यामुळे अखेर परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार दिघा येथील अनधिकृत इमारतींवर एमआयडीसीने कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी नियोजित चारपैकी दोन इमारतींवर एमआयडीसीतर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई काही दिवसांकरिता पुढे ढकलावी अशी तिथल्या रहिवाशांची मागणी होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाला बगल न देताच एमआयडीसीने दोन इमारतींवर कारवाई केली. भूमाफियांनी स्वत:च्या फायद्यासाठी उभारलेल्या या इमारतींमधील घरे विकून त्यांची फसवणूक केलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात भरडला गेलेला आहे तो फक्त सामान्य घर खरेदीदार. या कारवाईमुळे त्याठिकाणची अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. याचा सर्वाधिक मनस्ताप विद्यार्थ्यांना झाला असून अनेक जण दहावी, बारावीचे विद्यार्थी आहेत. ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात बेघर झाल्यामुळे परीक्षा द्यायची की नाही? द्यायची तर कशी? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. त्यावर उपाय म्हणून काही कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांकरिता मंदिरात ठाण मांडले आहे.कौटुंबिक परिस्थितीत सुधार घडवण्यासाठी शिक्षण हाच पर्याय असल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाचीही तयारी करत आहेत. तर मुलांना परीक्षेचा अभ्यास करता यावा व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशी पालकांची धारणा आहे. यामुळे त्यांनाही नाइलाजास्तव उघड्यावर संसार मांडावा लागला आहे. दुसरीकडे राहायला जायचे तर आर्थिक भार सोसणार कसा? जरी नातेवाइकांकडे आधार मिळाला तर विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होईल अशीही चिंता त्यांना सतावत आहे. या सर्व संकटांवर मात करून परीक्षा देण्याची जिद्द अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. याच जिद्दीने दिवस-रात्र एक करून मंदिराच्या आवारात ते अभ्यासासाठी जमत आहेत. त्यापैकीची निशा गुप्ता या बारावीच्या विद्यार्थिनीने स्वत:च्या भवितव्याची चिंता व्यक्त केली आहे. परीक्षेत उत्तम गुणांनी पास होण्याची तयारी सुरू असतानाच आपल्यावर बेघर होण्याची वेळ आल्याची नाराजी तिने व्यक्त केली. परंतु या संकटाला खचून न जाता मंदिरात बसून अभ्यास करून परीक्षा देत असल्याचेही तिने सांगितले. (प्रतिनिधी)