शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

छत हरपल्याने मंदिराचा आसरा

By admin | Updated: March 2, 2017 02:53 IST

अनधिकृत इमारतींवरील कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांपुढे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले

सूर्यकांत वाघमारे,नवी मुंबई- अनधिकृत इमारतींवरील कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांपुढे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन परीक्षेच्या काळात त्यांच्यावर हे संकट कोसळले असून त्यामधील बहुतेक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेले घरच राहिले नसल्यामुळे अखेर परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार दिघा येथील अनधिकृत इमारतींवर एमआयडीसीने कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी नियोजित चारपैकी दोन इमारतींवर एमआयडीसीतर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई काही दिवसांकरिता पुढे ढकलावी अशी तिथल्या रहिवाशांची मागणी होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाला बगल न देताच एमआयडीसीने दोन इमारतींवर कारवाई केली. भूमाफियांनी स्वत:च्या फायद्यासाठी उभारलेल्या या इमारतींमधील घरे विकून त्यांची फसवणूक केलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात भरडला गेलेला आहे तो फक्त सामान्य घर खरेदीदार. या कारवाईमुळे त्याठिकाणची अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. याचा सर्वाधिक मनस्ताप विद्यार्थ्यांना झाला असून अनेक जण दहावी, बारावीचे विद्यार्थी आहेत. ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात बेघर झाल्यामुळे परीक्षा द्यायची की नाही? द्यायची तर कशी? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. त्यावर उपाय म्हणून काही कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांकरिता मंदिरात ठाण मांडले आहे.कौटुंबिक परिस्थितीत सुधार घडवण्यासाठी शिक्षण हाच पर्याय असल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाचीही तयारी करत आहेत. तर मुलांना परीक्षेचा अभ्यास करता यावा व त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशी पालकांची धारणा आहे. यामुळे त्यांनाही नाइलाजास्तव उघड्यावर संसार मांडावा लागला आहे. दुसरीकडे राहायला जायचे तर आर्थिक भार सोसणार कसा? जरी नातेवाइकांकडे आधार मिळाला तर विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होईल अशीही चिंता त्यांना सतावत आहे. या सर्व संकटांवर मात करून परीक्षा देण्याची जिद्द अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. याच जिद्दीने दिवस-रात्र एक करून मंदिराच्या आवारात ते अभ्यासासाठी जमत आहेत. त्यापैकीची निशा गुप्ता या बारावीच्या विद्यार्थिनीने स्वत:च्या भवितव्याची चिंता व्यक्त केली आहे. परीक्षेत उत्तम गुणांनी पास होण्याची तयारी सुरू असतानाच आपल्यावर बेघर होण्याची वेळ आल्याची नाराजी तिने व्यक्त केली. परंतु या संकटाला खचून न जाता मंदिरात बसून अभ्यास करून परीक्षा देत असल्याचेही तिने सांगितले. (प्रतिनिधी)