शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरताच मांडणार वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका

By admin | Updated: September 24, 2016 03:16 IST

मराठा आरक्षणाचा विषय, त्यावरील माझी भूमिका मी अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यावर जाहीर करणार आहे

डोंबिवली : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असो किंवा मराठा आरक्षणाचा विषय, त्यावरील माझी भूमिका मी अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यावर जाहीर करणार आहे, असे समीक्षक अक्षयकुमार काळे यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले. कोणती उद्दिष्टे समोर ठेवून आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, असे विचारल्यावर त्यांनी हे स्पष्ट केले.संमेलनाध्यक्षाच्या उमेदवारांकडून साहित्यातील विविध प्रवाह, साहित्यमूल्ये याबाबत त्यांची भूमिका जशी अपेक्षित असते, दिशादर्शन अपेक्षित असते, तशीच अपेक्षा असते विविध सामाजिक प्रश्नांवरील भूमिका स्पष्ट करण्याची. विदर्भ स्वतंत्र करण्याचा विषय आणि मराठा समाजातर्फे भावना व्यक्त करण्यासाठी सुरू असलेले मूक मोर्चे याबाबत अध्यक्षपदाच्या या उमेदवारांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याबाबत साहित्यवर्तुळात उत्सुकता आहे. साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भात गेल्यापासून पुणे आणि नागपूर असा संघर्ष पाहायला मिळतो. त्याचे प्रत्यंतर संमेलनाचे स्थळ जाहीर करताना आले. यंदाचे संमेलनस्थळ असलेले डोंबिवली हे पुणे शाखेच्या कार्यक्षेत्रांतर्गत येते. पुण्यातर्फे गणेश देवी आणि रावसाहेब कसबे यांची तर विदर्भाकडून अक्षयकुमार काळे आणि रवींद्र शोभणे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीपासून संमेलन संस्थेवरील प्रभावापर्यंत अनेक बाबतीत हा ताण दिसेल, असे मानले जाते. (विशेष प्रतिनिधी)>अक्षयकुमार काळे यांची भिस्त विदर्भावरएकगठ्ठा मतदानासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ साहित्य संघावर अध्यक्षपदाचे उमेदवार अक्षयकुमार काळे यांची भिस्त असल्याचे सांगितले जाते. विदर्भाच्या भूमिकेवरच मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ यांची भूमिका ठरते. त्यामुळे तेथील मते बडोदा, आंध्र प्रदेश, पुणे-मुंबईतील प्राध्यापक मंडळी आणि काही माजी संमेलनाध्यक्ष, त्यांच्या समीक्षेचे रसिक यांचे मतदान त्यांना होईल, असे मानले जाते. चर्चेतील अन्य उमेदवार गणेश देवी आणि राबसाहेब कसबे यांना निवडणूक लढवण्यात रस नाही. बिनविरोध निवड व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे, तर ज्येष्ठ समीक्षक म.सु. पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अजून अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता दाखवलेली नाही.>ते महामंडळाचे कार्यक्षेत्रसाहित्य संमेलनाच्या स्थळाची निवड करताना समितीने डोंबिवली, कल्याण, बेळगावला भेट दिली होती. त्यातील डोंबिवलीची निवड झाली. त्यामुळे नाराज झालेल्या कल्याणच्या आयोजक संस्थेने संमेलनस्थळ निवडीत पारदर्शकता हवी, असे मत मांडले होते. त्याचे निकष स्पष्ट हवेत, अशीही त्यांची मागणी आहे. त्याबाबत, विचारता काळे म्हणाले, हा प्रश्न महामंडळ, अध्यक्ष, पदाधिकारी, संमेलनस्थळाची पाहणी करणारी समिती यांच्याशी निगडित आहे. त्याबाबत त्यांनीच भूमिका व्यक्त करणे सयुक्तिक ठरेल.>संमेलनाला वाद चिकटलेलेच; वादांशिवाय संमेलन कसे?राजकारण्यांना एवढी नावे ठेवता, तर मग तुम्ही एक तरी साहित्य संमेलन वादाशिवाय घेऊन दाखवा, अशी मार्मिक टीका करून माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी साहित्यिकांची नाराजी ओढवून घेतली होती. संमेलनस्थळ ठरवण्याच्या आणि ते जाहीर करण्यापासूनच डोंबिवलीचे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यापूर्वी मुंबईत झालेल्या साहित्य संमेलनाला बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बैलबाजारा’ची उपमा दिल्याने वाद उफाळला होता. तर, नथुराम गोडसे यांच्या गौरवास्पद उल्लेखाने ठाण्याच्या संमेलनात स्मरणिका जाळण्यात आल्या होत्या. सहिष्णुतेच्या वादात आनंद यादव यांचे अध्यक्षपद गेल्याने महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षांविना पार पडले होते. चिपळूणच्या संमेलनावेळी निमंत्रणपत्रिकेवर परशू छापण्याचा वाद गाजला होता. बेळगावच्या संमेलनात ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावरील निर्बंधांचा वाद गाजला होता. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवडला पार पडलेल्या साहित्य संमेलनापूर्वी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करण्यावरून वाद निर्माण झाला होता आणि संमेलन होऊ न देण्यापर्यंतचे इशारे देईपर्यंत मजल गेली होती.