शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अर्ज भरताच मांडणार वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका

By admin | Updated: September 24, 2016 03:16 IST

मराठा आरक्षणाचा विषय, त्यावरील माझी भूमिका मी अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यावर जाहीर करणार आहे

डोंबिवली : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असो किंवा मराठा आरक्षणाचा विषय, त्यावरील माझी भूमिका मी अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यावर जाहीर करणार आहे, असे समीक्षक अक्षयकुमार काळे यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले. कोणती उद्दिष्टे समोर ठेवून आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, असे विचारल्यावर त्यांनी हे स्पष्ट केले.संमेलनाध्यक्षाच्या उमेदवारांकडून साहित्यातील विविध प्रवाह, साहित्यमूल्ये याबाबत त्यांची भूमिका जशी अपेक्षित असते, दिशादर्शन अपेक्षित असते, तशीच अपेक्षा असते विविध सामाजिक प्रश्नांवरील भूमिका स्पष्ट करण्याची. विदर्भ स्वतंत्र करण्याचा विषय आणि मराठा समाजातर्फे भावना व्यक्त करण्यासाठी सुरू असलेले मूक मोर्चे याबाबत अध्यक्षपदाच्या या उमेदवारांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याबाबत साहित्यवर्तुळात उत्सुकता आहे. साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भात गेल्यापासून पुणे आणि नागपूर असा संघर्ष पाहायला मिळतो. त्याचे प्रत्यंतर संमेलनाचे स्थळ जाहीर करताना आले. यंदाचे संमेलनस्थळ असलेले डोंबिवली हे पुणे शाखेच्या कार्यक्षेत्रांतर्गत येते. पुण्यातर्फे गणेश देवी आणि रावसाहेब कसबे यांची तर विदर्भाकडून अक्षयकुमार काळे आणि रवींद्र शोभणे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीपासून संमेलन संस्थेवरील प्रभावापर्यंत अनेक बाबतीत हा ताण दिसेल, असे मानले जाते. (विशेष प्रतिनिधी)>अक्षयकुमार काळे यांची भिस्त विदर्भावरएकगठ्ठा मतदानासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ साहित्य संघावर अध्यक्षपदाचे उमेदवार अक्षयकुमार काळे यांची भिस्त असल्याचे सांगितले जाते. विदर्भाच्या भूमिकेवरच मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ यांची भूमिका ठरते. त्यामुळे तेथील मते बडोदा, आंध्र प्रदेश, पुणे-मुंबईतील प्राध्यापक मंडळी आणि काही माजी संमेलनाध्यक्ष, त्यांच्या समीक्षेचे रसिक यांचे मतदान त्यांना होईल, असे मानले जाते. चर्चेतील अन्य उमेदवार गणेश देवी आणि राबसाहेब कसबे यांना निवडणूक लढवण्यात रस नाही. बिनविरोध निवड व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे, तर ज्येष्ठ समीक्षक म.सु. पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अजून अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता दाखवलेली नाही.>ते महामंडळाचे कार्यक्षेत्रसाहित्य संमेलनाच्या स्थळाची निवड करताना समितीने डोंबिवली, कल्याण, बेळगावला भेट दिली होती. त्यातील डोंबिवलीची निवड झाली. त्यामुळे नाराज झालेल्या कल्याणच्या आयोजक संस्थेने संमेलनस्थळ निवडीत पारदर्शकता हवी, असे मत मांडले होते. त्याचे निकष स्पष्ट हवेत, अशीही त्यांची मागणी आहे. त्याबाबत, विचारता काळे म्हणाले, हा प्रश्न महामंडळ, अध्यक्ष, पदाधिकारी, संमेलनस्थळाची पाहणी करणारी समिती यांच्याशी निगडित आहे. त्याबाबत त्यांनीच भूमिका व्यक्त करणे सयुक्तिक ठरेल.>संमेलनाला वाद चिकटलेलेच; वादांशिवाय संमेलन कसे?राजकारण्यांना एवढी नावे ठेवता, तर मग तुम्ही एक तरी साहित्य संमेलन वादाशिवाय घेऊन दाखवा, अशी मार्मिक टीका करून माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी साहित्यिकांची नाराजी ओढवून घेतली होती. संमेलनस्थळ ठरवण्याच्या आणि ते जाहीर करण्यापासूनच डोंबिवलीचे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यापूर्वी मुंबईत झालेल्या साहित्य संमेलनाला बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बैलबाजारा’ची उपमा दिल्याने वाद उफाळला होता. तर, नथुराम गोडसे यांच्या गौरवास्पद उल्लेखाने ठाण्याच्या संमेलनात स्मरणिका जाळण्यात आल्या होत्या. सहिष्णुतेच्या वादात आनंद यादव यांचे अध्यक्षपद गेल्याने महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षांविना पार पडले होते. चिपळूणच्या संमेलनावेळी निमंत्रणपत्रिकेवर परशू छापण्याचा वाद गाजला होता. बेळगावच्या संमेलनात ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावरील निर्बंधांचा वाद गाजला होता. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवडला पार पडलेल्या साहित्य संमेलनापूर्वी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करण्यावरून वाद निर्माण झाला होता आणि संमेलन होऊ न देण्यापर्यंतचे इशारे देईपर्यंत मजल गेली होती.